एक्स्प्लोर

T20 World Cup 2022 : जे 2011 मध्ये घडलं, तसंच यंदाही घडतंय, पुन्हा इतिहास घडणार, भारत विश्वचषक जिंकणार?

T20 WC 2022 Stats: भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 मध्ये नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना गमावला. ज्यामुळे पुढील फेरीत एन्ट्रीसाठी उर्वरीत सामने जिंकणं महत्त्वाचं झालं आहे.

T20 World Cup 2022 : जागतिक क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा संघ असूनही मागील कित्येक वर्षे भारताला विश्वचषक उंचावता आलेला नाही. 2011 मध्ये भारतानं वन डे विश्वचषकाच्या रुपात वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर अद्याप भारत कोणताच विश्वचषक जिंकू शकलेल नाही. दरम्यान यंदा ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत चांगली कामगिरी करत असला तरी रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभूत झाल्यानं भारताचा प्रवास काहीसा अवघड झाला आहे. पण हे सारं असं असलं तरी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये घडून येणारा एक खास योगायोग सध्या सर्वांसाठीच चर्चेचा विषय घडत आहे. कारण 2011 विश्वचषकात घडलेल्या काही गोष्टी यंदाही घडत असून यामुळेच भारत यंदाही विश्वचषक उंचावेल अशी आशा फॅन्स व्यक्त करत आहेत.

सर्वात पहिला योगायोग म्हणजे भारताने नुकताच सुपर 12 ग्रुपमधील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावला असून 2011 मध्येही भारताला ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हाव लागलं होतं. ज्यानंतर भारतानं एकही सामना गमावला नव्हता आणि थेट वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाही भारत अशीच कामगिरी करेल अशी आशा आहे. दुसरा योगायोग म्हटलं तर आयर्लंड संघानं 2011 च्या विश्वचषकातही बलाढ्य इंग्लंड संघाला मात दिली होती. आयर्लंड आणि इंग्लंडचा खेळ पाहता इंग्लंड आयर्लंपेक्षा सरस असूनही धक्कादायकरित्या आयर्लंडनं 2011 मध्ये इंग्लंडला मात दिली. याचीच पुनरावृत्ती यंदाही झाली. तिसरा योगायोग म्हटलं तर 2011 विश्वचषकावेळीही भारताचे दोन्ही सराव सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोघांविरुद्ध झाले होते. तर यंदाही भारताचे सराव सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच होते. त्यामुळे असे काही योगायोग अगदी तसेच घडून येत असल्याने भारत यंदाही कप उंचावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.  

भारताला उर्वरीत सामने जिंकणं महत्त्वाचं

स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण सोबतच इतर संघ कशी कामगिरी करतील हे देखील महत्त्वाचं असेल. शिवाय ऑस्ट्रेलियात पावसाचा व्यत्यय सामन्यांमध्ये येत आहे, भारताच्या उर्वरीत दोन सामन्यातही पाऊस आला आणि सामने झाले नाहीत, तर देखील भारताचं पुढे जाणं अवघड होऊ शकतं. 

अशी आहे भारत असणाऱ्या ग्रुप 2 गुणतालिका

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णीत गुण नेट रनरेट
1 दक्षिण आफ्रिका 3 2 0 1 5 2.772
2 भारत 3 2 1 0 4 0.844
3 बांग्लादेश 3 2 1 0 4 -1.533
4 झिम्बाब्वे 3 1 1 1 3 -0.050
5 पाकिस्तान  3 1 2 0 2 0.765
6 नेदरलँड्स 3 0 3 0 0 -1.948

हे देखील वाचा-

T20 World Cup 2022: सर्वाधिक षटकार ठोकण्यात द. आफ्रिकेचा रिली रोसो पुढे, विकेट्समध्ये वानिंदु हसरंगा टॉपवर, वाचा संपूर्ण यादी

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
Embed widget