एक्स्प्लोर

T20 World Cup 2022 : जे 2011 मध्ये घडलं, तसंच यंदाही घडतंय, पुन्हा इतिहास घडणार, भारत विश्वचषक जिंकणार?

T20 WC 2022 Stats: भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 मध्ये नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना गमावला. ज्यामुळे पुढील फेरीत एन्ट्रीसाठी उर्वरीत सामने जिंकणं महत्त्वाचं झालं आहे.

T20 World Cup 2022 : जागतिक क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा संघ असूनही मागील कित्येक वर्षे भारताला विश्वचषक उंचावता आलेला नाही. 2011 मध्ये भारतानं वन डे विश्वचषकाच्या रुपात वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर अद्याप भारत कोणताच विश्वचषक जिंकू शकलेल नाही. दरम्यान यंदा ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत चांगली कामगिरी करत असला तरी रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभूत झाल्यानं भारताचा प्रवास काहीसा अवघड झाला आहे. पण हे सारं असं असलं तरी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये घडून येणारा एक खास योगायोग सध्या सर्वांसाठीच चर्चेचा विषय घडत आहे. कारण 2011 विश्वचषकात घडलेल्या काही गोष्टी यंदाही घडत असून यामुळेच भारत यंदाही विश्वचषक उंचावेल अशी आशा फॅन्स व्यक्त करत आहेत.

सर्वात पहिला योगायोग म्हणजे भारताने नुकताच सुपर 12 ग्रुपमधील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावला असून 2011 मध्येही भारताला ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हाव लागलं होतं. ज्यानंतर भारतानं एकही सामना गमावला नव्हता आणि थेट वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाही भारत अशीच कामगिरी करेल अशी आशा आहे. दुसरा योगायोग म्हटलं तर आयर्लंड संघानं 2011 च्या विश्वचषकातही बलाढ्य इंग्लंड संघाला मात दिली होती. आयर्लंड आणि इंग्लंडचा खेळ पाहता इंग्लंड आयर्लंपेक्षा सरस असूनही धक्कादायकरित्या आयर्लंडनं 2011 मध्ये इंग्लंडला मात दिली. याचीच पुनरावृत्ती यंदाही झाली. तिसरा योगायोग म्हटलं तर 2011 विश्वचषकावेळीही भारताचे दोन्ही सराव सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोघांविरुद्ध झाले होते. तर यंदाही भारताचे सराव सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच होते. त्यामुळे असे काही योगायोग अगदी तसेच घडून येत असल्याने भारत यंदाही कप उंचावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.  

भारताला उर्वरीत सामने जिंकणं महत्त्वाचं

स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण सोबतच इतर संघ कशी कामगिरी करतील हे देखील महत्त्वाचं असेल. शिवाय ऑस्ट्रेलियात पावसाचा व्यत्यय सामन्यांमध्ये येत आहे, भारताच्या उर्वरीत दोन सामन्यातही पाऊस आला आणि सामने झाले नाहीत, तर देखील भारताचं पुढे जाणं अवघड होऊ शकतं. 

अशी आहे भारत असणाऱ्या ग्रुप 2 गुणतालिका

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णीत गुण नेट रनरेट
1 दक्षिण आफ्रिका 3 2 0 1 5 2.772
2 भारत 3 2 1 0 4 0.844
3 बांग्लादेश 3 2 1 0 4 -1.533
4 झिम्बाब्वे 3 1 1 1 3 -0.050
5 पाकिस्तान  3 1 2 0 2 0.765
6 नेदरलँड्स 3 0 3 0 0 -1.948

हे देखील वाचा-

T20 World Cup 2022: सर्वाधिक षटकार ठोकण्यात द. आफ्रिकेचा रिली रोसो पुढे, विकेट्समध्ये वानिंदु हसरंगा टॉपवर, वाचा संपूर्ण यादी

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget