एक्स्प्लोर
अनुष्कासोबतच्या रिलेशनशीपबाबत विराट काय म्हणाला?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील ब्रेकअपची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरु होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच दोघंही डिनर डेट गेले होते. त्यानंतर विराटनं अनुष्कासोबत असणाऱ्या रिलेशनशीपबाबत एका मोठा खुलासा केला आहे. नुकताच विराटनं अनुष्कासोबतच्या ब्रेकअपबाबत उत्तर दिलं आहे. विराटनं या प्रश्नाचं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं उत्तर देताना म्हटलं की, 'आम्ही एका ब्रेकवर होतो.' टी-20 वर्ल्डकप दरम्यान विराटनं सोशल मीडियावर अनुष्का शर्माबाबत एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये विराटनं लिहलं होतं की, “अनुष्काबाबत नॉनस्टॉप जोक्स करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. जरा भान बाळगा. अनुष्कानं मला कायमच सकारात्मक उर्जा दिली आहे.” विराटच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याचं समर्थन केलं होतं.
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला





















