एक्स्प्लोर

रणजी करंडकाचा महासंग्राम आजपासून; मुंबई, विदर्भ, महाराष्ट्र नव्या मोसमासाठी सज्ज

यंदाच्या रणजी करंडकात चार गटातून 38 संघ सहभागी झाले आहेत. या 38 संघात साखळी फेरीच्या लढतीतून आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.

मुंबई : भारतीय क्रिकेटमधल्या सर्वात प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. देशांतर्गत क्रिकेटमधल्या या सर्वात मोठ्या स्पर्धेचं यंदाचं हे 86वं वर्ष आहे. यंदाचा रणजी मोसम काहीसा उशिराने सुरु झाला असून 9 डिसेंबर 2019 ते 13 मार्च 2020 दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदाच्या रणजी करंडकात चार गटातून 38 संघ सहभागी झाले आहेत. या 38 संघात साखळी फेरीच्या लढतीतून आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. मुंबईची 'खडूस आर्मी' सज्ज सर्वाधिक 41 वेळा रणजी करंडक पटकावलेला मुंबईचा संघही रणजीच्या नव्या मोसमासाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील मुंबईचा 'ब' गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात मुंबईची सलामीची लढत बडोद्याशी होत आहे. मुंबईच्या संघात कर्णधार सूर्यकुमार यादवसह टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, आदित्य तरे, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर अशा अनेक मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विदर्भ जेतेपदाची हॅटट्रिक साधणार? फैज फझलच्या नेतृत्त्वात विदर्भाने गेल्या दोन रणजी मोसमात अभूतपूर्व कामगिरी बजावली. फैजचं कुशल नेतृत्व, वासिम जाफरचा तगडा अनुभव आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचं मोलाचं मार्गदर्शन याच्या जोरावर 2017-18 च्या मोसमात विदर्भाने आपला 84 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवून पहिल्यांदा रणजी करंडकावर नाव कोरलं होतं. 2018-19 च्या मोसमातही विदर्भाने हाच करिष्मा पुन्हा दाखवला आणि सलग दुसऱ्यांदा रणजी विजेतेपद पटकावलं. त्यामुळे गतविजेते पुन्हा एकदा विजेतेपदावर नाव कोरुन विजेतेपदाची हॅटट्रिक साधणार का याची उत्सुकता आहे. विदर्भाचा संघ नव्या मोसमात दिल्लीविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे. वासिम जाफरचा 150 वा रणजी सामना भारताचा माजी सलामीवीर आणि मूळचा मुंबईकर असलेल्या वासिम जाफरसाठी दिल्लीविरुद्धची लढत महत्त्वाची ठरणार आहे. कारण यानिमित्ताने 40 वर्षांचा वासिम जाफर रणजी कारकीर्दीतला 150 वा सामना खेळत आहे. या कामगिरीसह रणजी करंडकात 150 सामने खेळणारा जाफर हा आजवरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. भारताकडून गेल्या 31 कसोटी आणि 2 वन डे खेळलेल्या जाफरच्या नावावर रणजीत सर्वाधिक धावांचा विक्रम जमा आहे. 149 सामन्यांत जाफरने सर्वाधिक 40 शतकांसह तब्बल 11 हजार 775 धावांचा रतीब घातला आहे. 2017-18 आणि 2018-19 या दोन्ही मोसमात विदर्भाच्या विजयात जाफरची कामगिरी मोलाची ठरली होती. महाराष्ट्राचं नशीब फळफळणार? नौशाद शेखचा महाराष्ट्र संघ गेल्या 78 वर्षांपासूनची महाराष्ट्राची विजेतेपदाची प्रतिक्षा संपवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रणजी इतिहासात विजय हजारेंच्या संघाने 1939-40 आणि 1940-41 अशी सलग दोन वर्ष विजेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर 1970-71, 1992-93 आणि 2013-14 या मोसमांत अंतिम फेरी गाठूनही महाराष्ट्राला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. यंदाच्या मोसमात महाराष्ट्राची सलामी हरियाणाशी होत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
RR vs RCB Live Score Update :कोहली-पाटीदारचा अनुभव की जैस्वाल-वैभव सूर्यवंशीची वादळं... आज कोणाचं नशीब चमकणार?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
RR vs RCB LIVE IPL 2026 : कोहली-पाटीदारचा अनुभव की जैस्वाल-वैभव सूर्यवंशीची वादळं... आज कोणाचं नशीब चमकणार?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Mukul Choudhary Untold Story : घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
हरलेला सामना जिंकला; Sanjiv Goenka भावनांना आवरू शकले नाहीत, भर मैदानात पळत सुटले अन्... नेमकं काय घडलं?
हरलेला सामना जिंकला; Sanjiv Goenka भावनांना आवरू शकले नाहीत, भर मैदानात पळत सुटले अन्... नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
Embed widget