एक्स्प्लोर

रणजी करंडकाचा महासंग्राम आजपासून; मुंबई, विदर्भ, महाराष्ट्र नव्या मोसमासाठी सज्ज

यंदाच्या रणजी करंडकात चार गटातून 38 संघ सहभागी झाले आहेत. या 38 संघात साखळी फेरीच्या लढतीतून आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.

मुंबई : भारतीय क्रिकेटमधल्या सर्वात प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. देशांतर्गत क्रिकेटमधल्या या सर्वात मोठ्या स्पर्धेचं यंदाचं हे 86वं वर्ष आहे. यंदाचा रणजी मोसम काहीसा उशिराने सुरु झाला असून 9 डिसेंबर 2019 ते 13 मार्च 2020 दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदाच्या रणजी करंडकात चार गटातून 38 संघ सहभागी झाले आहेत. या 38 संघात साखळी फेरीच्या लढतीतून आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. मुंबईची 'खडूस आर्मी' सज्ज सर्वाधिक 41 वेळा रणजी करंडक पटकावलेला मुंबईचा संघही रणजीच्या नव्या मोसमासाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील मुंबईचा 'ब' गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात मुंबईची सलामीची लढत बडोद्याशी होत आहे. मुंबईच्या संघात कर्णधार सूर्यकुमार यादवसह टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, आदित्य तरे, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर अशा अनेक मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विदर्भ जेतेपदाची हॅटट्रिक साधणार? फैज फझलच्या नेतृत्त्वात विदर्भाने गेल्या दोन रणजी मोसमात अभूतपूर्व कामगिरी बजावली. फैजचं कुशल नेतृत्व, वासिम जाफरचा तगडा अनुभव आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचं मोलाचं मार्गदर्शन याच्या जोरावर 2017-18 च्या मोसमात विदर्भाने आपला 84 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवून पहिल्यांदा रणजी करंडकावर नाव कोरलं होतं. 2018-19 च्या मोसमातही विदर्भाने हाच करिष्मा पुन्हा दाखवला आणि सलग दुसऱ्यांदा रणजी विजेतेपद पटकावलं. त्यामुळे गतविजेते पुन्हा एकदा विजेतेपदावर नाव कोरुन विजेतेपदाची हॅटट्रिक साधणार का याची उत्सुकता आहे. विदर्भाचा संघ नव्या मोसमात दिल्लीविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे. वासिम जाफरचा 150 वा रणजी सामना भारताचा माजी सलामीवीर आणि मूळचा मुंबईकर असलेल्या वासिम जाफरसाठी दिल्लीविरुद्धची लढत महत्त्वाची ठरणार आहे. कारण यानिमित्ताने 40 वर्षांचा वासिम जाफर रणजी कारकीर्दीतला 150 वा सामना खेळत आहे. या कामगिरीसह रणजी करंडकात 150 सामने खेळणारा जाफर हा आजवरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. भारताकडून गेल्या 31 कसोटी आणि 2 वन डे खेळलेल्या जाफरच्या नावावर रणजीत सर्वाधिक धावांचा विक्रम जमा आहे. 149 सामन्यांत जाफरने सर्वाधिक 40 शतकांसह तब्बल 11 हजार 775 धावांचा रतीब घातला आहे. 2017-18 आणि 2018-19 या दोन्ही मोसमात विदर्भाच्या विजयात जाफरची कामगिरी मोलाची ठरली होती. महाराष्ट्राचं नशीब फळफळणार? नौशाद शेखचा महाराष्ट्र संघ गेल्या 78 वर्षांपासूनची महाराष्ट्राची विजेतेपदाची प्रतिक्षा संपवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रणजी इतिहासात विजय हजारेंच्या संघाने 1939-40 आणि 1940-41 अशी सलग दोन वर्ष विजेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर 1970-71, 1992-93 आणि 2013-14 या मोसमांत अंतिम फेरी गाठूनही महाराष्ट्राला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. यंदाच्या मोसमात महाराष्ट्राची सलामी हरियाणाशी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant On Rohit Sharma : तू मुंबईचा राजा, तर मी राणी...; रोहित शर्माला धमकी देत राखी सावंतने भररस्त्यात घातला राडा, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
तू मुंबईचा राजा, तर मी राणी...; रोहित शर्माला धमकी देत राखी सावंतने भररस्त्यात घातला राडा, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
West Indies Squad VS India Series : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; स्टारला विश्रांती, तर नवख्यांना संधी! 15-15 खेळाडूंचा ODI अन् T20साठी चक्रावून टाकणारा Squad
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; स्टारला विश्रांती, तर नवख्यांना संधी! 15-15 खेळाडूंचा ODI अन् T20साठी चक्रावून टाकणारा Squad
Ajit Agarkar News : अजित आगरकरांनी अचानक का सोडलं पद? रोहित शर्मावरुन BCCIशी मतभेदांचा भडका, लक्ष्मण नको त्या कारणावरुन वाजलं, धक्कादायक Inside Story समोर
अजित आगरकरांनी अचानक का सोडलं पद? रोहित शर्मावरुन BCCIशी मतभेदांचा भडका, लक्ष्मण नको त्या कारणावरुन वाजलं, धक्कादायक Inside Story समोर
Mohsin Naqvi Asian Games 2026 : ट्रॉफी चोर मोहसिन नक्वीने आशिया कपमध्ये राडा घातला; आता आशियाई गेम्समध्येही मेडलवरून ड्रामा?; BCCIसमोर नवा पेच
ट्रॉफी चोर मोहसिन नक्वीने आशिया कपमध्ये राडा घातला; आता आशियाई गेम्समध्येही मेडलवरून ड्रामा?; BCCIसमोर नवा पेच

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Embed widget