एक्स्प्लोर
INDvsSL: श्रीलंकेविरुद्ध 600 धावा, भारताची सामन्यावर मजबूत पकड
भारतानं श्रीलंकेविरुद्ध पहिला डावात तब्बल 600 धावांचा डोगंर रचला आहे.

गॉल : गॉल कसोटीत शिखर धवन आणि पुजाराच्या दीड शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध तब्बल 600 धावांचा डोंगर रचला. पहिल्या दिवशी भारतानं 3 विकेट गमावून 399 धावांपर्यंत मजल मारली होती. तर दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 600 धावांवर आटोपला. दरम्यान, कर्णधार विराट कोहली या डावात सपशेल अपयशी ठरला. तो फक्त 3 धावांवर बाद झाला. मात्र, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पंड्या यांनीही अर्धशतकं झळकावली तर अश्विननं देखील 47 धावा केल्या. पहिल्या डावात नुवान प्रदिपनं सहा बळी घेतले तर कुमारानं 3 गडी बाद केले. मात्र, श्रीलंकेचे इतर गोलंदाज फार प्रभावी कामगिरी करु शकले नाही. श्रीलंकेला डावाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर करुणारत्ने अवघ्या 2 धावांवर बाद झाला. उमेश यादवनं त्याचा बळी घेतला. सध्या थरंगा आणि गुणतिलके मैदानावर आहेत. मोठी धावसंख्या उभारल्यानं भारतीय संघाला या सामन्यावर मजबूत पकड मिळवण्याची चांगली संधी आहे.
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला






















