'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
राज्यात लवकरच बिबट्या सफारी वाढणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक दिली. समाजात दोन प्रकारची लोकं आहेत, काही लोकं प्राण्यांना हानी झाली तर शासनाच्या विरोधात जातात, असे नाईक म्हणाले.

Anil Parab on Girish Mahajan: राज्यात चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरुच असताना आज (27 फेब्रुवारी) विधानसभेतील चर्चेनं चांगलंच लक्ष वेधलं. राज्यात लवकरच बिबट्या सफारी वाढणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक दिली. समाजात दोन प्रकारची लोकं आहेत, काही लोकं प्राण्यांना हानी झाली तर शासनाच्या विरोधात जातात, असे नाईक म्हणाले. त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढल्याने वनविभागाचे यश असल्याची प्रतिक्रिया दिली. प्राण्यांची संख्या वाढली असेल तर प्रत्येक जिल्ह्यात, कोकणात, पश्चिम महाराष्ट्र मध्ये एक बिबट सफारी आयोजित करू, असेही गणेश नाईक यांनी सांगितलं. सफारी कोणत्या ठिकाणी करता येईल, याबाबत अधिकऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पर्यटन पण होईल आणि मनाव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष थांबेल, त्यामुळे लवकरच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी वाढणार असल्याचे ते म्हणाले.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर?
दरम्यान, या चर्चेत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनीही सहभाग घेतला. या चर्चेवेळी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनिल परब यांनी चांगल्याच शाब्दिक कोट्या केल्या. अनिल परब म्हणाले की, मी क्यूरॅसिटी म्हणून काही प्रश्न विचारत आहे. विषय असा आहे की जिथे गिरीश महाजन जिथे आहेत तिथे बिबटे कसे घुसतील? सतेज पाटील यांनी सांगितलं की थर्मल कॅमरे द्या म्हटलेत ते कशासाठी वापरतील ते सांगावं, अशी मागी त्यांनी केली.
गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत
अनिल परब यांनी कुंभमेळ्या बिबट्या मुद्दा उपस्थित करताच गणेश नाईक म्हणाले, कुंभमेळ्यात बिबट्या गेला तर सर्व गोष्टीवर पाणी फिरलं जाईल. गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत. अजितदादा होते तेव्हा त्यांनी अनेक प्रकारे निधी दिला होता त्याचा वापर आपण करत आहोत. यावर अनिल परब म्हणाले की, सभागृहाचा सेन्स बघता कुंभमेळ्यात बिबट्या घुसले तर? जिथे गिरीश महाजन घुसले आहेत तिथे कोणाची हिम्मत आहे? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडले आहेत, जेरबंद केले आहेत. ते disaster management बघतात तर आता disaster तिथे गेले आहेत, असा टोला लगावला.
त्यानंतर गणेश नाईक म्हणाले की, अनिल परब यांनी जी बाब सांगतिली जी काही भागात खरी आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आहेत. कुंभमेळा दीड दोन वर्षांनी आहे. एखाद्या दिवशी तिथे बिबट्या गेला तर त्यावर पाणी फिरेल. त्यामुळे फक्त पत्र आणि गरज काय सांगा निधी देतो असं त्यांनी सांगितल. बिबट्या राज्यावर आपत्ती आहे हे आता जाहीर झालं आहे. कुठे येतील बिबट्या याची भीती आता वाटू लागली असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
























