एक्स्प्लोर

अटीतटीचा सामना आणि पांड्यांची शेवटची ओव्हर!

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामना अक्षरश: भारताच्या बाजूनं झुकवला.

थिरुवनंतरपुरम : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्याची मालिका टीम इंडियानं 2-1नं आपल्या नावावर केली आहे. पावसामुळे थिरुवनंतरपुरममधील तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना उशीरानं सुरु करण्यात आला. त्यामुळे सामना फक्त 8-8 षटकांचाच खेळवण्यात आला. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 5 विकेटच्या मोबदल्यात 67 धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामना अक्षरश: भारताच्या बाजूनं झुकवला. 67 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिल्या षटकातच मोठा धक्का बसला. गप्टिल फक्त एका रन करुन बाद झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. पण किवी फलंदाजांनी देखील शेवटपर्यंत हार मानली नाही. त्यामुळे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. सातव्या ओव्हरपर्यंत न्यूझीलंडनं 6 गडी गमावून 49 धावा केल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी 19 धावांची गरज होती. त्यावेळी कोहलीनं शेवटच्या ओव्हरसाठी हार्दिक पांड्याच्या हाती चेंडू सोपवला. यावेळी खेळपट्टीवर ग्रॅण्डहोम आणि सॅन्टनर ही जोडी होती. पहिल्याच चेंडूवर सॅन्टनरनं एक चोरटी धाव घेत ग्रॅण्डहोमला स्ट्राईक दिली. दुसऱ्याच चेंडूवर ग्रॅण्डहोमनं एक सरळ जोरदार फटका मारला. पण त्यावेळी पांड्यानं चेंडू अडवला. तेव्हा पांड्याच्या बोटाला दुखापतही झाली. पण त्यानं संघासाठी महत्त्वाच्या धावा वाचवल्या. पण तिसऱ्याच चेंडूवर ग्रॅण्डहोमनं थेट षटकार ठोकला. त्यामुळे पुढील तीन चेंडूमध्ये न्यूझीलंडला विजयसाठी फक्त 12 धावा हव्या होत्या. ग्रॅण्डहोमच्या फलंदाजीमुळे पांड्या काहीसा दबावात आला आणि त्यानं चौथ्या चेंडू वाईड टाकला. त्यामुळे आता तीन चेंडूमध्ये न्यूझीलंडला फक्त 11 धावा हव्या होत्या. पण यावेळी पांड्यानं चांगला चेंडू टाकत फक्त एकच धाव दिली. दोन चेंडूमध्ये 10 धावा हव्या असताना सॅन्टनर मोठा फटका मारु शकला नाही. या चेंडूवर त्याला दोनच धावा मिळाल्या. शेवटच्या चेंडूवर देखील सॅन्टनर फक्त एकच धाव घेऊ शकला आणि भारतानं सामन्यासह मालिकाही खिशात घातली.

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार? 
तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार? 
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडू पाकिस्तानला जाणार, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडू पाकिस्तानला जाणार, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
Ishan Kishan News : 27 चौकार, 7 षटकार... 250 धावा ठोकल्या अन् अचानक मैदान सोडलं! ईशान किशनसोबत नेमकं काय घडलं? सगळेच घाबरले
27 चौकार, 7 षटकार... 250 धावा ठोकल्या अन् अचानक मैदान सोडलं! ईशान किशनसोबत नेमकं काय घडलं? सगळेच घाबरले

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget