एक्स्प्लोर

T20 WC 2021 : उपांत्य फेरीचे चार संघ ठरले, पाहा कधी कोण कुणाविरोधात भिडणार

ICC T20 WC 2021 : न्यूझीलंडच्या विजयानंतर उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या चार संघाची नावं स्पष्ट झाली आहेत.

ICC T20 WC 2021 : न्यूझीलंडच्या विजयानंतर उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या चार संघाची नावं स्पष्ट झाली आहेत. अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघानं धडक मारली आहे. अफगाणिस्तान संघाचा पराभव करत न्यूझीलंडने धणक्यात उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा आज अखेरचा साखळी सामना असेल. अ गटामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघानं उल्लेखनीय कामगिरी केली. या तिन्ही संघाचे प्रत्येकी आठ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या आधारावर इंग्लंड आणि ऑस्ट्रिलायनं उपांत्य फेरीत धडक मारली. ब गटामध्ये पाकिस्तानच्या संघानं निर्वादित वर्चस्व राखलं आहे. साखळी फेरीत पाकिस्तान संघानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. प्रत्येक सामन्यात पाकिस्तान संघानं एकहाती विजय संपादन केलाय. न्यूझीलंड संघाला फक्त एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. न्यूझीलंड संघानं सांघिक खेळाच्या बळावर उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 

आज, भारत आणि नामेबिया यांच्यात विश्वचषकातील अखेरचा साखळी सामना असेल. 10 नोव्हेंबरपासून उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. सर्व सामने सायंकाळी होणार आहे. पहिला उपांत्य सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड संघामध्ये अबू धाबीच्या मैदानावर रंगणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ संघामध्ये लढत होणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ दुबईच्या मैदानावर उतरणार आहेत. दोन्ही उपांत्य सामन्यातील विजेते संघ 14 नोव्हेंबर रोजी टी-20 विश्वचषकासाठी भिडणार आहेत. अंतिम सामना दुबईच्या मैदानावर होणार आहे.


T20 WC 2021 : उपांत्य फेरीचे चार संघ ठरले, पाहा कधी कोण कुणाविरोधात भिडणार

भारताची निराशाजनक कामगिरी –

यंदाच्या विश्वचषकात भारताची कामगिरी निराशजनक राहिली आहे. साखळी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला होता. तेव्हाच भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून होता. मात्र, न्यूझीलंड संघानं दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. आज, भारत आणि नामेबिया यांच्यामध्ये अखेरचा साखळी सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विश्वचषकात

विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी -

24 ऑक्टोबर- पाकिस्तानकडून 10 विकेटनं पराभव. 

31 ऑक्टोबर- न्यूझीलंडकडून 8 विकेटनं पराभव स्विकारला

3 नोव्हेंबर – अफगानिस्तानला 66 धावांनी हरवलं.

5 नोव्हेंबर- स्कॉटलँडचा 8 विकेटनं पराभव केला

8 नोव्हेंबर – नामेबियाविरोधात आज लढत

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Embed widget