एक्स्प्लोर

शुभमन गिल कॅप्टन म्हणून पास पण फलंदाज म्हणून एक गोष्ट कमी होती, निवड समितीच्या माजी अध्यक्षांचं परखड मत

Shubman Gill : टीम इंडियाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष साबा करीम यांनी शुभमन गिल कॅप्टन म्हणून यशस्वी ठरल्याचं म्हटलंय.

नवी दिल्ली : भारत आणि झिम्बॉब्वे (IND vs ZIM) यांच्यातील पाच सामन्यांची टी 20 मालिका नुकतीच पार पडली. भारतानं 4-1 अशी मालिका जिंकली. टीम इंडियाची (Team India) यंग ब्रिगेड बीसीसीआयनं झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर पाठवली होती. या दौऱ्याचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे (Shubman Gill) देण्यात आलं होतं. शुभमन गिलसाठी ही मोठी संधी होती. कारण, शुभमन गिलकडे पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं होतं. भारतानं मालिकेतील पहिली मॅच गमावल्यानंतर शुभमन गिलवर दबाव निर्माण झाला होता.  मात्र,  भारतानं कमबॅक करत सलग चार मॅच जिंकल्या. भारताच्या यंग ब्रिगेडच्या कामगिरीवर निवड समितीचे माजी अध्यक्ष साबा करीम यांनी मत मांडलं आहे.  

शुभमन गिल कशात कमी पडला?

शुभमन गिलच्या कामगिरीवर निवड समितीचे माजी अध्यक्ष साबा करीम यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. साबा करीम यांनी शुभमन गिलनं ज्या प्रकारे भारताच्या टीमचं नेतृत्त्व  केलं त्यानं प्रभावित असल्याचं म्हटलं. मात्र, शुभमन गिल सलामीवीर म्हणून सातत्य राखण्यात अपयशी ठरल्याचं साबा करीम म्हणाले. गिलनं पाच मॅचेसमध्ये 170 धावा केल्या होत्या. मालिकेत सर्वाधिक धावा शुभमन गिलनं केल्या असल्या तरी गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात तो अपयशी ठरला. 

शुभमन गिलला सर्व म्हणजेच पाच मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, अभिषेक शर्मा आणि यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड प्रभावी ठरले, असं साबा करीम म्हणाले. 

शुभमन गिलला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संघात स्थान मिळालं नव्हतं. शुभमन गिलला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आली होती. भारतीय निवड समितीनं शुभमन गिलवर विश्वास ठेवत झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावेळी कॅप्टन म्हणून संधी देत विश्वास टाकला होता.  


रोहित शर्मानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे खेळाडू उपलब्ध नसल्यानं शुभमन गिलला झिम्बॉब्वेचा कॅप्टन करण्यात आलं होतं. साबा करीम यांनी शुभमन गिल कॅप्टन म्हणून यशस्वी ठरला मात्र फलंदाज म्हणून त्याच्यामध्ये सातत्य नव्हतं, असं म्हटलं.

शुभमन गिल कॅप्टन म्हणून यशस्वी ठरला मात्र त्याचवेळी तो सलामीवर म्हणून त्याच्या फलंदाजीत सातत्य राखण्यात अपयशी ठरल्याचं साबा करीम म्हणाले. यशस्वी जयस्वालला  टी 20 वर्लड कपमध्ये संधी मिळाली नाही मात्र तो झिम्बॉब्वे दौऱ्यात चांगली फलंदाजी करण्यात यशस्वी ठरल्याचं  साबा करीम म्हणाले.

संबंधित बातम्या :

6,1,6,6,6 शेवटच्या दोन ओव्हरमध्ये षटकारांचा पाऊस, 11 बॉलमध्ये 66 धावा, फलंदाजांनी विजय खेचून आणला, पाहा व्हिडीओ

Hardik Pandya : हार्दिक पांड्या टी 20 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व करणार, उपकॅप्टन पदासाठी दोन जण शर्यतीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikroli Dahihandi Shibir : विक्रोळीत दहीहंडी शिबीर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरीWestern Railway Megablock : पश्चिम रेल्वेवर 35 दिवस मेगाब्लॉक! 31 ऑगस्टपासून 960 फेऱ्यांवर परिणामABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 August 2024pune Police Attack: रामटेकडी परिसरात पोलिसावर हल्ला, संरक्षण करणारे सुरक्षित नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Women safety: रात्रीच्या वेळी एकटीनं ओला-उबरनं प्रवास करताय?  काय खबरदारी घ्याल? 
Women safety: रात्रीच्या वेळी एकटीनं ओला-उबरनं प्रवास करताय?  काय खबरदारी घ्याल? 
Embed widget