एक्स्प्लोर

Rohit Sharma : टीम कल्चरसाठी धोका...बीसीसीआयने रोहित शर्माचं कर्णधारपद का हिसकावलं?; Inside माहिती समोर!

Rohit Sharma News : भारताच्या एकदिवसीय कर्णधारपदाचा रोहित शर्माचा कार्यकाळ संपला आहे. ऑस्ट्रेलियातील 3 सामन्यांच्या मालिकेपूर्वी 4 ऑक्टोबर 2025 रोजी शुभमन गिलची नवीन कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली.

Rohit Sharma News : भारताच्या एकदिवसीय कर्णधारपदाचा रोहित शर्माचा कार्यकाळ संपला आहे. ऑस्ट्रेलियातील तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी, शनिवार, 4 ऑक्टोबर 2025 रोजी शुभमन गिलची नवीन कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. पण, 38 वर्षीय रोहित शर्मा या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या संघाचा भाग आहे. दरम्यान, रोहित शर्माला हटवून शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याच्या निर्णयावर मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. 

अजीत आगरकर यांनी सांगितले की, तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार ठेवणे जवळजवळ अशक्य आहे. मात्र, एका अहवालानुसार या मोठ्या निर्णयामागे आणखी एक महत्त्वाचे कारण दडलेले आहे, असे समोर आले आहे. निवडकर्त्यांना रोहित शर्माने ड्रेसिंग रूममध्ये आपली इच्छा लादावी असे वाटत नव्हते, ज्यामुळे संघाच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

ड्रेसिंग रूमच्या वातावरणाची चिंता

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने या निर्णयामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असून आता ते फक्त वनडे सामने खेळतात. जो फॉरमॅट सर्वात कमी प्रमाणात खेळला जातो. त्यामुळे त्यांचे कर्णधारपद टिकवणे संघासाठी आव्हानात्मक ठरू शकले असते.

बीसीसीआयच्या सूत्राच्या मते, “रोहित हा खेळाडू म्हणून खूप मोठ्या दर्जाचा आहे. जर तो कर्णधार राहिला असता, तर ड्रेसिंग रूममध्ये त्याची स्वतःची विचारधारा प्रभावी ठरली असती. पण आता तो केवळ वनडे खेळतो, त्यामुळे संघाच्या वातावरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती.” निवडकर्त्यांना वाटले की मर्यादित फॉरमॅटमध्ये रोहितचा दीर्घकालीन प्रभाव टीम कल्चरवर योग्य ठरणार नाही.

गंभीर आणि आगरकर यांची 2027 वर्ल्ड कपसाठी दूरदृष्टी...

अहवालानुसार, हा निर्णय कोच गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांच्या सल्ल्यानुसार घेण्यात आला आहे. सुरुवातीला गंभीर यांनी संघाच्या बाबतीत फारसे हस्तक्षेप केले नव्हते, परंतु न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकातील पराभवानंतर त्यांनी संघाचे नेतृत्व अधिक ठामपणे हाताळण्यास सुरुवात केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, गंभीर आणि आगरकर हे 2027 च्या वनडे विश्वचषकाकडे लक्ष ठेवून भविष्यासाठी स्पष्ट योजना आखत आहेत. त्यांना वाटते की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर अचानक परिणाम होऊ नये. त्यामुळे गिलला लवकर कर्णधार बनवून पुढील दोन वर्षांत तो स्वतःच्या पद्धतीने संघ उभारू शकेल, अशी त्यांची भूमिका आहे. आता ऑस्ट्रेलियातील मालिकेत रोहित आणि कोहली दोघेही गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी हा निर्णय दूरदृष्टीने घेतलेले एक मोठे पाऊल मानले जात आहे.

हे ही वाचा -

Bernard Julien passes away : क्रीडाविश्वात शोककळा! भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेटवर दुःखाचा डोंगर, पहिला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू काळाच्या पडद्याआड

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'विनाशकाले विपरीत बुद्धी', मित्रपक्षांच्या बेजबाबदार आरोपांवर Ajit Pawar यांची संयमी प्रतिक्रिया
Sharad Pawar On Yuti : कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, शरद पवारांच्या सूचना
Maha Politics: 'सत्तेच्या टेबलवर बसणं गरजेचं', ठाकरेंना धक्का देत Deepesh Mhatre यांचा BJP मध्ये प्रवेश
Raj Thackeray Voting List : राज ठाकरेंच्या मनसेचं ठरलं? दुबार मतादारांवर नजर
Ajit Pawar in Satara: 'मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जातं'; अजित पवारांचा सूचक इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Embed widget