एक्स्प्लोर

ICC U19 World Cup: यापूर्वीही चार वेळा टीम इंडियाने जिंकला आहे अंडर 19 विश्वचषक, विराटसह 'हे' आहेत विजयी कर्णधार

ICC U19 World Cup: यंदाचा अंडर 19 विश्वचषक भारताने यश धुलच्या नेतृत्वाखालील जिंकत पाचवं जेतेपद खिशात टाकलं आहे.

ICC U19 World Cup: अंडर-19 विश्वचषकाचा थरार नुकताच पार पडला. अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत करत पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलं. दरम्यान, या संपूर्ण स्पर्धेत भारताने पाच पैकी पाच सामने जिंकत अप्रतिम कामगिरी केली होती. तर याआधीही चार वेळा भारताने अंडर 19 विश्वचषक जिंकला आहे.

भारताने आतापर्यंत 2000, 2008, 2012, 2018 आणि आता 2022 साली या विश्वचषकावर नाव कोरलं आहे. भारताने याआधी चार वेळा जिंकलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेदरम्यानच्या भारतीय कर्णधारांपैकी तीन कर्णधारांनी भारतीय क्रिकेट गाजवलं असून एका कर्णधाराला मात्र हवी तशी संधी मिळाली नाही. तर नेमके हे कर्णधार कोण आहेत? आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मोहम्मद कैफ

भारतीय संघात खालच्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ याच्या नेतृत्त्वाखाली 2000 साली  विश्वचषक जिंकला होता. यावेळी संघात युवराज सिंग हा स्टार खेळाडू असून त्याने मालिकावीराचा खिताबही मिळवला होता.

विराट कोहली

2000 सालानंतर 2008 साली भारताने पुन्हा एकदा अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलं. यावेळी कर्णधार होता भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असणारा विराट कोहली. कोहलीला रवीद्र जाडेजा, मनीष पांडे या खेळाडूंची साथ मिळाली होती.

उन्मुक्त चंद

या यादीतील असा एकमेव खेळाडू ज्याला भारतीय संघात चमकण्याची संधी मिळाली नाही तो म्हणजे उन्मुक्त चंद. 2012 साली भारताला विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त याला खास संधी न मिळाल्याने त्याने काही काळापूर्वीच भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत अमेरिकेत पोहोचला आहे.

पृथ्वी शॉ

2012 नंतर थेट 2018 मध्ये भारताने मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अंडर 19 विश्वचषक उचलला. यावेळी शुभमन गिल हा स्टार फलंदाज असून त्याने मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला होता.

2022 साली यशच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकला विश्वचषक

यानंतर आता थेट 2022 साली भारताने अंडर 19 विश्वचषक पुन्हा जिंकत सर्वाधिक वेळा हा खिताब मिळवला आहे. यंदा भारताने स्पर्धेतील पाच पैकी पाचही सामने जिंकत स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांवेळी यशसह इतर काही खेळाडू कोरोनाबाधित झाले असताना निशांत सिंधू याने कर्णधारपद सांभाळला होतं. दरम्यान अंतिम सामन्यात 4 विकेट्सने इंग्लंडला मात देत भारताने हा सामना आणि स्पर्धा जिंकली आहे.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Multibagger Stock : 2 रुपयांच्या स्टॉकनं गुंतवणूकदार मालामाल, वर्षभरात 8000 टक्के रिटर्न, आता शेअर किती रुपयांवर?
2 रुपयांच्या पेनी स्टॉकची दमदार कामगिरी, वर्षभरात 8000 टक्के वाढ, सध्या शेअर कितीवर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Mahayuti : शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीसांनी कुदळ घेऊन औरंगजेबाची कबर उद्धवस्त करावीABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 18 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सPravin Datke on Nagpur Clash : नागपुरात राडा, पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप आमदार प्रविण दटके EXCLUSIVENagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Multibagger Stock : 2 रुपयांच्या स्टॉकनं गुंतवणूकदार मालामाल, वर्षभरात 8000 टक्के रिटर्न, आता शेअर किती रुपयांवर?
2 रुपयांच्या पेनी स्टॉकची दमदार कामगिरी, वर्षभरात 8000 टक्के वाढ, सध्या शेअर कितीवर?
Pune Crime News : विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
Chhaava Box Office Collection Day 32: 'छावा'ची कमाई घटली, तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर भल्याभल्यांना नमवलं; फक्त काही पावलं अन् थेट 'स्री 2'ला देणार धोबीपछाड
'छावा'ची कमाई घटली, तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर भल्याभल्यांना नमवलं; फक्त काही पावलं अन् थेट 'स्री 2'ला देणार धोबीपछाड
Multibagger Stock : 1 रुपयाचा 'हा' शेअर 400 पार गेला, पाच वर्षात 23494 टक्के परतावा, 50 हजारांचे बनले 1 कोटी रुपये
पाच वर्षात 'या' मल्टीबॅगर स्टॉकनं पैशांचा पाऊस पाडला, 23494 टक्के रिटर्न, 50 हजारांचे एक कोटी बनले
Embed widget