एक्स्प्लोर

IND vs AUS, 4th Test Toss Update : नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

IND vs AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानात खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक जिंकत कांगांरुनी फलंदाजी निवडली आहे.

IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानात खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार होते, ज्यातील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला असून तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने मालिकेची स्थिती 2-1 अशी आहे. आता आजचा सामना जिंकून मालिकाविजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करु शकतो. तर ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत सोडण्यासाठी प्रयत्नशील असेल. विशेष म्हणजे आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे आजच्या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज (Anthony Albanese) स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Team India (@indiancricketteam)

 

आजवरच्या इतिहासाचा विचार केल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 105 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 44 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. 

भारतीय संघात महत्त्वाचा बदल

याशिवाय भारतीय संघाच्या प्लेईंग 11 चा विचार करता भारत केवळ एका बदलासह मैदानात उतरत आहे. अनुभवी मोहम्मद शमीचा प्लेईंग 11 मध्ये पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद सिराजला विश्रांची देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. 

भारताची प्लेईंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

WTC Final मध्ये एन्ट्रीसाठी भारताला विजय महत्त्वाचा

आजची कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. सध्या, टीम इंडिया 60.29 च्या विजयाच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 68.52 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर असून WTC फायनलमध्ये पोहोचली आहे.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यातही बेंचवरच असणार? टीम इंडियाच्या कोचचं 'ते' रोखठोक वक्तव्य चर्चेत 
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यातही बेंचवरच असणार?  टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मिळणार की नाही?  टीम इंडियाच्या कोचचं रोखठोक वक्तव्य चर्चेत
IND vs ENG 2nd T20 Playing 11 : अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT...; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing-11
अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT...; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing-11
IND vs ENG 2nd T20I : पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?
पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?
IND vs ENG 2nd T20I : टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा 'तो' व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले
टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा 'तो' व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget