एक्स्प्लोर

IND vs AUS Super Over: सुपरओव्हर सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; स्मृती मानधनाची जबरदस्त कामगिरी

IND vs AUS Super Over: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियममध्ये (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या दुसरा टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला.

IND vs AUS Super Over: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियममध्ये (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 187 धावापर्यंत मजल मारता आली. त्यानंतर सुपरओव्हर सामन्यात स्मृती मानधना (Smriti Mandhana), रिचा घोष (Richa Ghosh) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 21 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भारताची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरनं (Renuka Thakur Singh) भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. ज्यामुळं सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय. 

ट्वीट-

 

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपरओव्हरचा थरार
सुपर ओव्हरमध्ये भारतानं एक विकेट गमावून 20 धावा केल्या. यादरम्यान स्मृतीनं एक चौकार आणि एक षटकार ठोकला. रिचानंही एक षटकार मारला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ एक विकेट गमावून 16 धावाच करू शकला. अशाप्रकारे भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात भारतानं सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी रेणुका सिंहकडं सोपवली. तिनं 16 धावांत एक विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला.

मोक्याच्या क्षणी रिचा घोषची फटकेबाजी
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मानं शानदार खेळी केली. पण शेफाली 23 चेंडूत 34 धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जही स्वस्तात माघारी परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरनं 21 धावांचं योगदान दिलं. अखेरच्या दोन षटकात ऋचा घोष आणि देविका वैद्य यांनी जोरदार फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 187 धावापर्यंत पोहचवली. ज्यामुळं हा सामना बरोबरीत सुटला.

ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी
नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिली आणि बेथ मुनी सलामी देण्यासाठी मैदानात आल्या. अॅलिसा 25 धावा करून बाद झाली.  दीप्ती शर्मानं तिला आपल्या जाळ्यात अडकवलं. मात्र, त्यानंतर  ताहिल आणि बेथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 148 धावांची भागिदारी झाली. ताहिलनं 51 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. या खेळीत तिनं 10 चौकार आणि एक षटकार मारला. तर,  बेथनं 54 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. ज्यात 13 चौकारांचा समावेश होता. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं 20 षटकांत एक विकेट गमावून 187 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मानं 4 षटकात 41 धावा देत एक विकेट घेतली. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget