एक्स्प्लोर

पिढीतील अंतरामुळे कुंबळे आणि विराटमध्ये धुसफूस : सुनील गावसकर

नवी दिल्ली : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेदांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं मत टीम इंडियाचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. दोघांमधील पिढीत जे अंतर आहे, त्यामुळे असं होतं. प्रत्येक संघाच्या बाबतीतला हा प्रकार आहे, असं सुनील गावसकर एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. प्रशिक्षक वेगळ्या पिढीतील खेळाडू असतो आणि कर्णधार वेगळ्या. त्यामुळे प्रशिक्षकाची कार्यपद्धती वर्तमान पिढीपेक्षा जरा वेगळी असते. मैदानात जरी ते दिसून आलं नाही, तरी अभ्यास सत्र किंवा संघ व्यवस्थापनाच्या वेळी हे अंतर दिसून येतं. त्यामुळे याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं गावसकर म्हणाले. दरम्यान सुनील गावसकर यांनी अनिल कुंबळेंचं कौतुकही केलं. प्रशिक्षक म्हणून कुंबळेने चांगलं काम केलं आहे. गेल्या वर्षभरातील संघाची कामगिरी पाहिली, तर कुंबळेने चुकीचं काहीही केलेलं नाही, असं गावसकर म्हणाले. टीम इंडियाच्या भविष्याचा विचार असणारा आणि संघासाठी काही तरी व्हिजन असणारा प्रशिक्षक असावा, असा सल्लाही गावसकर यांनी दिला. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत आल्याने बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकाचा शोध घेणं सुरु केलं आहे. त्यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. मात्र अनिल कुंबळेंना कार्यकाळ वाढवून न देण्याची भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. कोहली आणि कुंबळेमध्ये फूट! विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक सीनियर खेळाडू प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर नाराज आहेत. अनिल कुंबळे ज्यापद्धतीने संघाला मार्गदर्शन करतो, त्यावर खेळाडू नाखुश आहेत. कुंबळे संघात वट निर्माण करत आहे. ह्या वागणुकीमुळेच खेळाडूंनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कुंबळेची तक्रार केली आहे. टीम इंडियाचे सीनियर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये कुंबळेच्या अॅटिट्यूडला कंटाळले आहेत. खेळाडूंच्या मते, कुंबळे ड्रेसिंग रुममधील त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीदरम्यान दोघांमध्ये धुसफूस विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील धुसफूस मार्च महिन्यात धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यादरम्यान सुरु झाली. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या संघातील समावेशाबद्दल विराट कोहलीला अगदी शेवटच्या क्षणी सांगण्यात आलं होतं, असं काही वृत्तात म्हटलं आहे. ‘त्रिदेव’ करणार कुंबळे आणि कोहलीमध्ये समेट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 4 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधी कुंबळे आणि कोहलीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सल्लागार समितीचे सदस्य आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दोघांमध्ये समेट घडवून आणू शकतात. मात्र टीम इंडियाचा नवा प्रशक्षिक निवडण्याची जबाबदारीही याच तीन दिग्गजांवर सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेवर नाराज बीसीसीआयचं विद्यमान अधिकाऱ्यांना अनिल कुंबळे पसंत नाही. बीसीसीआयचे हे अधिकारी चॅपियन्स ट्रॉफी न खेळण्याची धमकी देत होते, तेव्हा कुंबळेनेच सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीला संदेश पाठवून, खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. ही बाब बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आवडली नाही. याशिवाय कसोटी, वन डे आणि टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या खेळांसाठी वेगळा करार करण्याची कुंबळेची मागणी बीबीसीआयला आवडली नव्हती. बीसीसीआयच्या वार्षिक करारातल्या ‘अ’ श्रेणीतल्या क्रिकेटपटूंच्या पगारात 150 टक्क्यांनी वाढ करावी अशी मागणी भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीने केली आहे. संबंधित बातम्या

कोहली आणि कुंबळेची धुसफूस, सीनियर खेळाडूही नाराज

कुंबळेवर BCCI नाराज, टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु

champions trophy 2017 : आता बॅटमध्ये मायक्रो चिप, ICC चा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
IND vs SL : कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget