एक्स्प्लोर

IND vs PAK: भारताविरुद्ध काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार पाकिस्तान, कारण जाणून वाटेल अभिमान

India vs Pakistan, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) हा सामना खेळला जाणार आहे.

India vs Pakistan, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला काहीच तास शिल्लक असताना भारताविरुद्ध पाकिस्तानचा संघ (Team Pakistan) हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे. मुसळधार पावसामुळं पाकिस्तानमध्ये महापूर आलाय. ज्यामुळं नागिरकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधल्या पूरग्रस्तांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे, असं कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) पत्रकार परिषदमध्ये म्हटलंय. 

पाकिस्तानमध्ये महापूर
मुसळधार पावसामुळं पाकिस्तानमध्ये आलेल्या महापूरमुळं नागरिकांवर अनेक संकटाचा सामना करावा लागतोय. या पूरात आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. पाकिस्तानमधील 'डॉन' वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये महापुरामध्ये आतापर्यंत 1000 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 343 मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरुच आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, देशात 14 जूननंतर सिंध प्रांतामध्ये पुरामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तसेच कराची, पंजाब आणि बलूचिस्तानमध्येही परिस्थिती फारच वाईट आहे. पाकिस्तीनी मीडिया रिपोर्टनुसार, देशातील 70 टक्के भागाला पुराचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सिंध प्रांतावर झाला आहे. या महाप्रलयामुळं सुमारे तील कोटी लोकांचे संसार पाण्यात वाहून गेले असून लोक बेघर झाले आहेत. पूरामध्ये मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पूरग्रस्तांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध आज खेळण्यात येणाऱ्या टी-20 सामन्यात काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे. 

बाबर आझम काय म्हणाला?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदमध्ये बाबर आझम म्हणाला की," पाकिस्तानचे नागरिक सध्या कठीण काळातून जात आहेत, त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आहोत. टीम म्हणून आम्ही नागरिकांची मदत करणार आहोत."

2021 टी-20 विश्वचषकात भारताचा दारूण पराभव
इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं भारताचा 10 विकेट्सनं पराभव केला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं सलामीवीर रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना बाद घेऊन भारताच्या टॉप ऑर्डरला धक्का दिला होता. ज्यामुळं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानं तडाखेबाज फलंदाजी करत भारताचा 10 विकेट्सनं पराभव केला होता. विश्वचषकातील सामन्यात पहिल्यांदाच भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागलाय.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget