एक्स्प्लोर
Solapur: सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी सोलापुरात विराट मोर्चा, मोठ्या संख्येनं शेतकरी मोर्चात सहभागी
सोलापुरात श्री सिद्धेश्वर कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळ सुरू करा या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला.
Solapur News
1/12

सोलापुरात श्री सिद्धेश्वर कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळ सुरू करा या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला.
2/12

सिद्धेश्वर साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
3/12

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळ सुरु करा या मागणीसाठी हा मोर्चा निघाला.
4/12

या मोर्चात कारखान्याचे सभासद शेतकरी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
5/12

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि शहरातल्या होम मैदानापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला
6/12

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप, प्रहार या पक्षाच्या नेतेमंडळींनीही या मोर्चाला पाठिंबा दिला होता.
7/12

श्री सिद्धेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडदी या मोर्चाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आक्रमक भूमिकेत दिसले.
8/12

त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाची सरकार कशी दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
9/12

सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी सोलापूरच्या होटगी रोड विमानतळच्या विमानसेवेला अडथळा सुरु ठरत असल्याने ही चिमणी पाडून विमानसेवा सुरु व्हावी या साठी सोलापुरात आंदोलन झाले.
10/12

या आंदोलनाला आधी उपोषण, नंतर रास्ता रोको आणि आता विराट मोर्चाने उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला
11/12

कधीकाळी बचावात्मक पवित्रा घेणारे धर्मराज कडादी आज पहिल्यांदाच आक्रमक भूमिकेत दिसले.
12/12

अनेक वर्षांपासून होणाऱ्या आरोपांना आज रस्त्यावर उतरून धर्मराज कडारी यांनी उत्तर दिलं.
Published at : 19 Dec 2022 03:23 PM (IST)
आणखी पाहा






















