एक्स्प्लोर
Jayakwad Water discharge : जायकवाडी धरणातून पाण्याचा लोंढा बाहेर पडला, गोदावरी नदीचं पाणी गावांमध्ये शिरलं
जालना अंबड घनसावंगी आणि परतूर तालुक्यात पूराचा गंभीर धोका 38 गावे संकटात, 18 हजार नागरिकांचे स्थलांतर
Jayakwad Water discharge
1/8

जायकवाडी धरणातून प्रथमच विक्रमी असा पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे, त्यामुळे नांदेडमध्ये सध्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
2/8

18 हजार नागरिकांचे प्रशासनाकडून स्थलांतर. 8 हजार नागरिकांची विविध शाळा महाविद्यालया मध्ये राहण्याची व्यवस्था
3/8

अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील तब्बल 38 गावांना पूराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.अनेक गावांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरले
4/8

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत 3 लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत असून जालना जिल्ह्यातील गोदागाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
5/8

शहरातील अनेक खालच्या भागांत पाणी साचले आहे. त्यामुळे महापालिकेने पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र उभारली आहेत.
6/8

कालपासून प्रशासनाने सुमारे 18 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यापैकी जवळपास 8 हजार जणांसाठी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांसह 23 ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
7/8

जायकवाडीचा पाण्याचा विसर्ग कमी होईपर्यंत नांदेडमधील पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
8/8

त्यामुळे प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिलेला आहे, याचा गोदावरी नदीच्या काठावरून आढावा घेतलाय
Published at : 29 Sep 2025 12:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























