एक्स्प्लोर

Ujani dam: जल संकट! उजनी धरणाची वाटचाल मृत पाणी साठ्याकडे; पुढील दोन दिवसात धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता

Solapur : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण (Ujani Dam) पुढील दोन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस आहे.

Solapur : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण (Ujani Dam) पुढील दोन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस आहे. म्हणजे उजनीमध्ये केवळ 2 टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा आहे. त्यानंतर उजनी धरण हे मृत पाणी साठ्यात जाणार आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 6 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 110 टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी असून यांपैकी 63 टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर 54 टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या 65 पूर्णांक 57 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात जल संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

अक्कलकोटच्या कुरनूर धरणातून 250 क्युसेसने पाण्याचा विसर्ग, 3 दरवाजे उघडले

उन्हाळी हंगामासाठी अक्कलकोटच्या कुरनूर धरणातून आज (16 एप्रिल ) दुसऱ्या आवर्तनाचे पाणी 250 क्युसेसने सोडण्यात आले. यासाठी धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या कुरनूरच्या धरणात 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी अंदाजे 8 ते 10 टक्के पाणी विसर्गासाठी वापरण्यात येणार आहे. धरणाखालील एकूण 8 बंधारे या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, कमी साठ्यामुळे सर्व बंधारे भरतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. तरीही,  नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपयुक्त ठरणार आहे.

हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची दाहीदिशा

वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील चामला या गावातील ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती होत आहे. ग्रामस्थांना एक ड्रम पाण्यासाठी दोनशे ते तिनशे रुपये मोजावे लागत आहे. गावातील पाणी निवारणासाठी अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळं बाजूच्या गावातून आठवड्यातून एकदा पाणी आणावं लागत आहे. त्यामुळं चामला गाव अजूनही तहानलेलचं आहे.

चामला या पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात ही विहीर आहे. ज्यात बाजूच्या गावातून पाईपलाईनद्वारे पाणी येतं. शेजारच्या गावातून मिळणारं पाणी चामला गावासाठी अपुरं पडतं. त्यामुळेच आठवड्यातून एकवेळ काही मिनिटांसाठी पाणी नळाला मिळतं. गेल्या  अनेक वर्षापासून हीच परिस्थिती या परिसरात आहे. महिलांच्या डोक्यावर हंडा, तरुणांच्या मोटरसायकलवर पाण्याच्या कॅन तर म्हाताऱ्यांच्या हातात बादल्या. सकाळ संध्याकाळ पाण्यासाठी परिसर पिंजून पाणी आणलं जात आहे. शासन दरबारी पाणीबाणी सोडविण्याची विनंती झाली. आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवून झाले, पण ही पाणीबाणीअद्याप सुटली नाहीए. गावातल्या या पाणी टंचाईवर महिलांचा रोष व्यक्त केला आहे. 

तीन किलो मीटरवर नदी, मात्र दहा गाव तहानलेलीच!

दरम्यान, चामला गावापासून तीन किलो मीटर अंतरावर जाम नदी आहे. याच नदीचे पाणी अप्पर वर्धा धरणात पोहचते. छोटा तलाव बांधून हे पाणी अडवले तर या गावासह परिसरातील दहा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. सध्या गावात इतर शेतांमधून पाणी आणून गावकरी आपली तहान भागवत आहे. तर काहीजण पाण्यासाठी पैसे देखील मोजत आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी होते आहे.

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
58 लाखातील एकही नोंदी कमी करु नका, अन्यथा रस्ते बंद होतील, मनोज जरांगेंचा इशारा, म्हणाले, मी विखे पाटील आणि फडणवीसांचा जप सुरु केलाय
58 लाखातील एकही नोंदी कमी करु नका, अन्यथा रस्ते बंद होतील, मनोज जरांगेंचा इशारा, म्हणाले, मी विखे पाटील आणि फडणवीसांचा जप सुरु केलाय
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
ABP Majha Top 10, 31 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 31 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget