एक्स्प्लोर

Paytm द्वारे रोज 30 ते 40 ग्राहकांची फसवणूक; अशी घ्या काळजी

पेटीएम या ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून दररोज 30 ते 40 जणांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यासंबंधी कंपनीने ग्राहकांना आवाहन केले आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यात खासकरुन पेटीएमच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने पेटीएमशी संपर्क साधून याबद्दल जाणून घेतले. याविषयी माहिती देताना त्यांनी फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी पेटीएमच्या ग्राहकांना आवाहन केले आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पेटीएम ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार वाढले असल्याची कबुली पेटीएम पेमेंट्स बँकचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट सुमित सोमानी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिली. मागील 2 महिन्यांपासून ग्राहकांच्या फसवणुकीच्या सख्येत सातत्याने वाढ होत आहे. पेटीएमला दररोज 30 ते 40 ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारी जास्तकरुन दिल्ली, मुंबई, अशा मोठ्या शहरातून येत असल्याचे सोमानी यांनी सांगितले. अशी होते ऑनलाईन फसवणूक पेटीएम केवायसीच्या नावाखाली ग्राहकांची सातत्याने फसवणूक होत आहे. यात केवायसीची मर्यादा संपल्याचा फोन ग्राहकांना करुन मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागितला जातो. अनेक लोकांना लाखोंचा गंडा याद्वारे घालण्यात आलेला आहे. तर, कधी थर्ड पार्टी अॅप डॉउनलोड करायला सांगितले जाते. यात सरतेशेवटी ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झालेले असतात. जोपर्यंत ग्राहकांना याची माहिती होते, तोर्यंत उशिर झालेला असतो. असाच फ्रॉड इतर अॅपच्या माध्यमातूनही करण्यात येत आहे. मात्र, पेटीएमच्या नावाखाली फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. या फसवणुकीच्या तक्रारी जास्तकरुन झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यातील ठराविक जिल्ह्यातून जास्त येत असल्याची माहिती, सुमित सोमानी यांनी दिली. झारखंडमधूल जमताडा आणि गिरडीह, बिहारमध्ये धनबाद आणि गया या जिल्ह्यातून तक्रारी आल्या आहेत. तर, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद, नॉर्थ 24 आणि साउथ 24 विभागातील काही ठिकाणांहून या तक्रारी आल्या आहेत. सायबर सेलच्या विश्लेषणानुसार, सरासरी 10 ते 15 हजारापर्यंत ग्राहकांची फसवणूक झालेली आहे. सोमानी म्हणाले, की दररोज पेटीएमच्या माध्यमातून 5 ते 6 कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. यात 30 ते 40 फसवणुकीच्या तक्रारी येत असतील तर त्या सामान्य आहेत. मात्र, तरीही ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आम्ही या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करत आहे. यासाठी वेगवेगळ्या सुरक्षा पद्धतींचा वापर करण्यावर आम्ही भर देणार असल्याचे सोमानी यांनी सांगितले. पेटीएमचे आवाहन - जर तुम्हाला कोणी कॉल करून सांगतिले की, पेटीएम केवायसी समाप्त झाली आहे. अथवा एसएमएसच्या माध्यमातून ती पुर्ण करा. तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कोणतेही पेटीएम अथवा पेटीएमचे कर्मचारी अशाप्रकारे कॉल करुन कधीच केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यास सांगत नाहीत. थर्ड पार्टी अॅप मोबाईलमध्ये इंस्टॉल करु नका. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांचे केवायसी केवळ त्यांच्या एजेंटद्वारे केले जाते. याशिवाय तुम्ही पेटीएम अॅपवर देखील मिनिमम केवायसी प्रक्रिया पुर्ण करू शकता. त्यामुळे पेटीएमच्या नावाखाली येणाऱ्या कॉलला उत्तर देऊ नका. अन्यथा तुमचे खाते रिकामे होईल. संबंधित बातम्या : Online Fraud बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा नाशिकमधील ऑनलाईन फसवणुकीमागे पाकिस्तान कनेक्शन ? कोल्हापूर अर्बन बँकेला ऑनलाईन गंडा, लाखो रुपये 34 खात्यांवर ट्रान्सफर Online Fraud I बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा I एबीपी माझा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Embed widget