एक्स्प्लोर

शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारला आदेश

पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकरांनी यातील गैरव्यवहाराची चौकशी ईडी मार्फत करावी अशी मागणी थेट पंतप्रधानांकडे केली होती. या तक्रारीला उत्तर देताना पंतप्रधानांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत शिवस्मारकाचा अहवाल राज्य सरकारकडून मागवला आहे. 29 नोव्हेंबर 2019 रोजी तसे आदेश पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आले आहेत.

पिंपरी : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सविस्तर अहवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकरांनी यातील गैरव्यवहाराची चौकशी ईडी मार्फत करावी अशी मागणी थेट पंतप्रधानांकडे केली होती. या तक्रारीला उत्तर देताना पंतप्रधानांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत शिवस्मारकाचा अहवाल राज्य सरकारकडून मागवला आहे. 29 नोव्हेंबर 2019 रोजी तसे आदेश पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आले आहेत. भापकर यांनी दोन महिन्यांपूर्वी या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रिया आणि कंत्राटातील याच गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे केली 25 सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे केली होती. शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारला आदेश आपल्या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारकडून उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाची उंची 121.2 मीटर कायम ठेवत संरचनेत मात्र बदल करण्यात आला आहे. आधी 3826 कोटी रुपयांच्या निविदेत 83.2 मीटर उंचीचा पुतळा तर 38 मीटर लांबीची तलवार असं 121.2 मीटरचे स्मारक उभारले जाणार होते, परंतु एल अॅंण्ड टी कंपनीसोबत वाटाघाटी करत 121.2 मीटर उंची कायम ठेवत पुतळ्याची 75.7 मीटर तर तलवारीची लांबी 45.5 मीटर करण्यात आली आहे. यासाठी निविदेची रक्कम ही 2500 कोटींवर आणली असल्याचं भापकरांनी तक्रारीत म्हटलं आहे. तसेच क्षेत्रात ही बदल केल्याचं नमूद केलं आहे. निविदा प्रक्रिया आणि कंत्राटातील याच गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी भापकरांनी केली आहे. शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारला आदेश शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारला आदेश या पत्राला मोदी यांच्या कार्यालयाकडून आता दोन महिन्यानंतर उत्तर आले आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत शिवस्मारकाचा अहवाल राज्य सरकारकडून मागवला आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, काँग्रेस-राष्ट्रवादीने केला होता गंभीर आरोप अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला होता. शिवस्मारकाच्या कामातील अनियमितता आणि गैरव्यवहाराबाबत कॅगच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्याचा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत आणि राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केला होता. शिवस्मारकातील गैरव्यवहाराबाबत विभागीय लेखापालांनी लिहिलेले पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उघड केलं. प्रकल्पाची एक वीटही न रचता 80 कोटी रुपये खर्च केले गेले. हे पैसे देण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा अधिकाऱ्यांचा लेखी पत्रात दावा आहे. सरकारने शिवस्मारकाची 121.2 मीटर उंची कायम ठेवताना पुतळ्याची उंची कमी केली आणि तलवारीची उंची वाढवली. स्मारकाची जागाही कमी करण्यात आली, असं नवाब मलिक आणि सचिन सावंतांनी सांगितलं होतं. संबंधित बातम्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप   शिवस्मारक रखडणार, काम सुरु न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 May 2026: आज शुक्रवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेम जीवनात शुभवार्ता.. आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेम जीवनात शुभवार्ता.. आजचे राशीभविष्य
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीच्या भारतातील फॉलोअर्सची संख्या किती? अभिजीत दीपकेंकडून आकडेवारी शेअर
कॉकरोच जनता पार्टीच्या भारतातील फॉलोअर्सची संख्या किती? अभिजीत दीपकेंकडून आकडेवारी शेअर
तहसलीदार राकेश गिड्डेंच्या अपघाती निधनानंनतर सरकारचा मोठा निर्णय, पत्नीला अनुकंपा तत्वावर देणार नोकरी
तहसलीदार राकेश गिड्डेंच्या अपघाती निधनानंनतर सरकारचा मोठा निर्णय, पत्नीला अनुकंपा तत्वावर देणार नोकरी
NEET UG 2026 : नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?
नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Embed widget