एक्स्प्लोर

Raj Thackeray : उद्या मुंबईला हात घालतीत, विदर्भाचा तुकडा पाडतील; मनसेच्या शिबीरातून राज ठाकरेंचा घणाघात

Raj Thackeray : आपण अटकेपार झेंडा फडकवले आहेत. तिथपर्यंत मराठा साम्राज्य गेले होते. आपण इतिहास विसरलो आहोत. मोबाईल , टेलिव्हिजन मध्ये बिझी आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray : ज्याप्रकारची न्यायव्यवस्था सध्या आहे. ते पाहता राज्यकर्ते उद्या मुंबईला हात घालतील, विदर्भाचा तुकडा पाडतील. कारण आपण संपूर्ण प्रदेशावर राज्य केलय. त्यामुळेच यांचा आपल्या प्रदेशावर डोळा आहे. गेली ७० वर्ष हे सुरू आहे. आपण अटकेपार झेंडा फडकवले आहेत. तिथपर्यंत मराठा साम्राज्य गेले होते. आपण इतिहास विसरलो आहोत. मोबाईल , टेलिव्हिजन मध्ये बिझी आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. कर्जत येथील मनसेच्या शिबिरात ते बोलत होते. 

महापुरुषांच्या पुतळ्याला का हार घालायचे?

राज ठाकरे म्हणाले, जर आपण महापुरुषांचे ऐकणारच नाहीत. तर त्यांचा पुतळ्याला हार का घालायचे? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. शिवाजी महाराजांनी समुद्रामार्गे शत्रू येईल, असे सांगितले होते. त्यांनी त्यासाठी आरमार उभे केले. आज त्याच मार्गाने कसाब महाराष्ट्रात आला. आरडीएक्स महाराष्ट्रात आणले गेले. तरीही आपण महापुरुषांनी काय सांगितले आहे याचा विचार करत नाहीत.  

गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा

राज ठाकरे म्हणाले, आज महाराष्ट्रात सहकार चळवळ उभी राहिली. आत्ताचे सहकार म्हणजे सरकार चळवळ नव्हे. आताचे सरकार म्हणजे सहारा चळवळ आहे. आमच्या ज्योतीराव फुलेंनी सहकार चळवळ उभी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये, यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी चळवळ सुरु केली. हा इतिहास विखे-पाटील, धनंजय गाडगीळ यांच्यापासून सुरु झाला. सहकार चळवळीत महाराष्ट्र 1 नंबरला आहे. त्यानंतर गुजरातचा नंबर आहे. गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. 

तर मराठवाड्याचा वाळवंट होईल

आपण इतिहासाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मराठवाड्यातील पाण्याची परिस्थिती वाईट आहे. 800 ते 900 फूट खाली जाऊनही विहिरीला पाणी लागत नाही. तुम्ही मराठवाड्यात साखर कारखाने सुरु करत आहात. तिथे ऊसाचे पीक घेण्यास सुरुवात झाली. मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा तज्ज्ञांनी केलाय. या प्रदेशात वाळवंट झाल्यानंतर ती जमिन पूर्ववत करण्यासाठी 400 ते 500 वर्ष लागतील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, आज आपण जाती जातींमध्ये भांडत आहोत. हे चालू नाही तर चालवलं जात आहे. यासाठी बाहेरची लोक प्रयत्न करत आहेत. जे महाराष्ट्रात चांगले आहे ते बाहेर काढा आणि जे बाहेर काढता येत नाही ते उद्धवस्त करा, असे बाहेरच्या लोकांचे धोरण आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केलाय. जगभरात जेवढी युद्ध झाली त्यालाच आपण इतिहास म्हणून वाचतो. कोणताही इतिहास भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. युद्ध म्हणजे जमिन मिळवणे. 

आपल्या नेत्यांना पाठीचा मणका नाही, ते मिंधे झालेत - ठाकरे 

तुमच्या जमिनी काढून घेतल्या जातात, तुम्हाला काहीही समजत नाही. नवे रस्ते बनवण्यास सुरुवात झाली की, आपल्या जमिनी जातात. बाहेरच्या राज्यातील लोक जमिनी विकत घेतात. माझी मराठी बांधवांना विनंती आहे, आपल्या बाजूला काय सुरु आहे ?  याबाबत सतर्क राहा. आपल्या विरोधात सहकार चळवळ सुरु आहे. आपले नेते मिंधे झालेले आहेत. त्यांना पाठीचा मणका नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Maharashtra Politics : नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 August 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
रेलिंग तुटून दोन पर्यटक दरीत कोसळले, पालघरच्या जव्हारमधील दाभोसा धबधब्यावर धक्कादायक घटना 
रेलिंग तुटून दोन पर्यटक दरीत कोसळले, पालघरच्या जव्हारमधील दाभोसा धबधब्यावर धक्कादायक घटना 
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget