एक्स्प्लोर

Uday Samant Exclusive: हल्ले करणाऱ्यांच्या विचारांची मला कीव येते, मी शांत आहे हतबल नाही; हल्ल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया

आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने  मी सुखरुप आहे मला कोणतीही ईजा झाली नाही. सुभाष देसाईंचा अकलेची मला कीव करावीशी वाटते.

Uday Samant Exclusive: आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने  मी सुखरुप आहे मला कोणतीही ईजा झाली नाही. सुभाष देसाईंचा आणि हल्ले करणाऱ्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते. लोकशाहीमध्ये एखादा विचार बदलणं चांगल्या गोष्टींसाठी उठाव करणं याचा परिणाम अशा हल्ल्यात होत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. घडलेल्या प्रकारावर मी फार बोलत नाही याचा अर्थ मी हतबल आहे असा नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी एबीपी माझाला दिली आहे.

माझ्या गाडीच्या मागे मुख्यमंत्र्यांची गाडी येण्याची शक्यता होती. त्या गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत देखील होते. मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली असती तर त्यांच्यावर देखील हा हल्ला होऊ शकला असता, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर काल (2 ऑगस्ट) कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली . शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचं शिंदे गटाचं मत आहे.  मात्र या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण हिंसक झाल्याचं चित्र आहे.

राजकारणाची लढाई ही विचारांची असते. त्यामुळे विकासाबाबत विचार करावा, कालचा जो हल्ला झाला तो ज्यांनी केला त्यांची मला कीव येते. टीकेचं उत्तर विकासकामे करुन द्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. मी बोलत नाही. उत्तर देत नाही प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ माझ्यावर चांगले संस्कार आहेत. मी काहीच करु शकत नाही असा जर कोणाचा गोड गैरसमज असेल तर चुकीचं आहे. मी सामान्य कार्यकर्ता असतो आणि माझ्या नेत्यांनी असं केलं असतं तर मी स्वत: त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, असंही ते म्हणाले.

राजकारण हे आरोग्यदायी असलं पाहिजे. मात्र हे राजकारण हिंसक होत आहे. कात्रजमध्ये आदित्य ठाकरेंचं आक्रमक भाषण झालं होतं. त्यांनी आम्हाला अर्वाच्च भाषेत बोलणं गद्दार म्हणणं यात काही नवीन नाही. मात्र हत्यारं घेऊन लोकं जर सभेला येत असेल तर हे चुकीचं आहे. माझी गाडी जात असताना मला वाईट भाषेत बोलत होते. त्यानंतर अनेक तरुणांनी हल्ला करायला सुरुवात केली. मात्र त्या हल्ल्यात मी वाचलो. मात्र राजकारणाची पातळी घसरली आहे. याचं प्रतिक म्हणजे कालचा हल्ला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या सगळ्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. सेना स्टाईलने उत्तर देऊ अशा धमक्या देतात तर नारायण राणेंना नाव ठेवायचा यांचा अधिकार नाही, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मला आदर होताच मात्र कालच्या त्यांच्या वागणुकीमुळे आदर वाढला. त्यांनी मला कुटुंबीयांसारखं जपलं. मुख्यमंत्री असून देखील ते दीनानाथ रुग्णालयात माझ्याबरोबर थांबले. असा मुख्यमंत्री होणे नाही. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री असा त्यांच्या प्रवास आहे. मात्र मुख्यमंत्री असूनसुद्धा ते माझी सतत चौकशी करत होते. काही सुरक्षारक्षक माझ्यासाठी ठेवले होते. त्यामुळे मी कायम एकनाथ शिंदेच्या सोबत असेल, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: मोहरमदरम्यान पेन किलर म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, एकाची प्रकृती गंभीर, 14 हजार गोळ्या जप्त
मोहरमदरम्यान पेन किलर म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, एकाची प्रकृती गंभीर, 14 हजार गोळ्या जप्त
Ketan Agarwal Death : केतन अन् सियाचं लग्नासाठी 17 कोटींचा खर्च नव्हता; ना विमानं बुक केली, जयपूरला नाही तर...; सियाच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, खरा खर्चही सांगितला
केतन अन् सियाचं लग्नासाठी 17 कोटींचा खर्च नव्हता; ना विमानं बुक केली, जयपूरला नाही तर...; सियाच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, खरा खर्चही सांगितला
Ketan Agarwal Death Case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; सिया गोयलविरुद्ध ठोस पुरावेच नाहीत? बचाव पक्षाचा मोठा दावा; उज्ज्वल निकम लढवणार खटला, काय आहे बचाव पक्षाचे दावे?
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; सिया गोयलविरुद्ध ठोस पुरावेच नाहीत? बचाव पक्षाचा मोठा दावा; उज्ज्वल निकम लढवणार खटला, काय आहे बचाव पक्षाचे दावे?
Ketan Agrawal Pune Lohagad Case: सख्ख्या भावनेही आता सियाला तोंडावर पाडलं; पोलिसांना दिली केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण देणारी माहिती, 10 तासांच्या चौकशीत काय काय म्हणाला?
सख्ख्या भावनेही आता सियाला तोंडावर पाडलं; पोलिसांना दिली केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण देणारी माहिती, 10 तासांच्या चौकशीत काय काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Video: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
TET Paper Leak: मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
Embed widget