Pune Crime : गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही चिमुकल्यांनाही इंद्रायणीच्या प्रवाहात जीवंत फेकलं, पुणे हादरलं!
Pune Crime : विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना इंद्रायणीच्या नदी (Indrayani River) पात्रात जिवंत फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
![Pune Crime : गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही चिमुकल्यांनाही इंद्रायणीच्या प्रवाहात जीवंत फेकलं, पुणे हादरलं! Pune Crime Death of girlfriend during abortion while disposing of the dead body both of her babies were thrown alive in the stream of Indrayani river Pune News Marathi News Pune Crime : गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही चिमुकल्यांनाही इंद्रायणीच्या प्रवाहात जीवंत फेकलं, पुणे हादरलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/22/d658051d3a1eed6b4b6c299484b79fce1721646071491924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Crime : विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना इंद्रायणीच्या नदी (Indrayani River) पात्रात जिवंत फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्याच्या (Pune) मावळ (Maval) तालुक्यातून ही धक्कादायक आणि हादरुन सोडणारी घटना (Pune Crime) समोर आलीये. ही संतापजनक घटना 9 जुलै रोजी घडली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत.
या-मया न दाखवता दोन्ही मुलांना नदीच्या प्रवाहात जीवंत फेकून दिलं
अधिकची माहिती अशी की, गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. 6 जुलै रोजी गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचं गर्भपात करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जीवंत फेकून दिलं.
पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघांकडून उडवाउडवीची उत्तरं
दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे ही काही घडलंच नाही, असं वावरू लागले. दरम्यानच्या काळात प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं, तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होती. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन् दोघांनी घडला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ahmednagar Crime : अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाला संपवलं, संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, कोपरगावात खळबळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)