एक्स्प्लोर

बाबरी मशीद पाडणं हे अचानक घडलं नव्हतं, माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोलेंची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेलल्या घटनांवरून भारताची वाटचाल हिंदू राष्ट्राच्या दिशेने सुरु झाली असल्याचं आपल्याला जाणवत असल्याचेही गोडबोले म्हणालेत. भारताचा पाया हा धर्मनिरपेक्ष राज्य पद्धतीत असून तो कमकुवत होत असताना त्याचं रक्षण करण्यात विरोधी पक्ष कमी पडत असल्याचं माधव गोडबोलेंनी म्हटलंय.

पुणे : बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात आलेला न्यायालयाचा निकाल हा आपल्याला अपेक्षित नव्हता, असं माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी म्हटलंय. माधव गोडबोले हे जेव्हा बाबरी मशिद पाडली गेली तेव्हा केंद्रीय गृह सचिव होते. त्याचबरोबर बाबरी मशीद पाडणं हे अचानक घडलं नाही. त्यासाठी काही काळ पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती, असंही माधव गोडबोले यांनी म्हटलंय.

आजच्या निकालाविरोधात केंद्र सरकारने उच्च न्यायालयात आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात देखील जायला हवं अशी अपेक्षाही माधव गोडबोले यांनी व्यक्त केलीय. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेलल्या घटनांवरून भारताची वाटचाल हिंदू राष्ट्राच्या दिशेने सुरु झाली असल्याचं आपल्याला जाणवत असल्याचेही गोडबोले म्हणालेत. भारताचा पाया हा धर्मनिरपेक्ष राज्य पद्धतीत असून तो कमकुवत होत असताना त्याचं रक्षण करण्यात विरोधी पक्ष कमी पडत असल्याचं माधव गोडबोलेंनी म्हटलंय. आज निकाल देताना न्यायालयाने बाबरी मशिद पाडली जाणं हा कारस्थानाचा भाग नव्हता असं म्हटलंय. मात्र आपल्याला तसं वाटत नाही असं माधव गोडबोले म्हणालेत.

बाबरी मशिद पाडली जाणं ही उत्स्फूर्त घटना नव्हती तर त्यासाठी आधीपासूनच पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती. बाबरी प्रकरणाचा निकाल आल्यानंतर काशी, मथुरा आणि इतर ठिकाणच्या धार्मिक स्थळांबद्दलची मागणीही आक्रमक पद्धतीने होऊ लागलीय. ती पाहता आपण हिंदू राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत असल्याचं गोडबोलेंनी म्हटलंय. हिंदू राष्ट्र होणं हे ज्या देशात 20 टक्के जनता अल्पसंख्यांक आहे त्या देशासाठी अडचणीचं ठरू शकतं, असं गोडबोलेंनी म्हटलंय. तसं झाल्यास ज्या राज्यांमध्ये अल्पसंख्यांक अधिक आहेत अशा पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमधूनही अशाचप्रकाराच्या मागण्या पुढं येऊ शकतात, अशी भीती गोडबोले यांनी व्यक्त केलीय.

Babri verdict : ऐतिहासिक निकाल, 28 वर्ष, 49 आरोपी... विध्वंस ते निकाल, संपूर्ण घटनाक्रम

भारताचा पाया हा धर्मनिरपेक्ष राज्यपद्धतीवर रचण्यात आला आहे. त्याचं रक्षण करण्यात विरोधी पक्ष कमी पडतायत. ज्या पक्षांनी देशाची राज्यघटना तयार करण्यात महत्वाची भूमिका पार पडली होती ते पक्ष आणि त्या पक्षाचं नेतृत्व लोकांमध्ये धर्मनिरपेक्षतेचं महत्व पटवून देण्यात कमी पडतंय असंही माधव गोडबोले यांनी म्हटलंय. आता जनभावना ही धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करण्याकडे आहे. मात्र जनमानस तयार करणं, लोकांची मतं घडवणं हे राजकीय नेतृत्वाच काम असल्याचेही गोडबोले यांनी म्हटलंय.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष 

माधव गोडबोले हे बाबरी मशिदीचा विध्वंस झाला तेव्हा गृह सचिव असल्याने त्यांच्याकडे सर्व घटना आणि घडामोडींची माहिती आपसूक पोहचत होती आणि त्यावेळची निर्णय प्रक्रियाही त्यांनी जवळून पाहिलीय. निवृत्तीनंतर गोडबोले यांनी अनेक पुस्तकं आणि लेखांच्या माध्यमातून रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा विध्वंस याबद्दल भाष्य केलंय. भारताची राजकीय प्रक्रिया पुन्हा सुरळीत व्हावी यासाठी धर्म आणि राजकारण यांची फारकत व्हायला हवी असं गोडबोलेंच म्हणणंय. त्यासाठी देशाच्या संसदेत कायदा व्हायला हवा असंही मत गोडबोले यांनी वेळोवेळी व्यक्त केलीय.

गोडबोले यांनी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणावर व्यक्त केलेल्या मताबद्दल प्रतिक्रियाही उमटतायत. मात्र लोकांचं मत बनवण्यासाठी राजकीय नेतृत्वाने पुढाकार घ्यायला हवा असं गोडबोले आवर्जून सांगतायत. परखड मतं ही पुरावे आणि संदर्भ यांच्यावर आधारित असल्यानं त्यांच्याशी सहमत नसणाऱ्यांनाही ती खोडून काढणं अवघड जात असल्याचं आतापर्यंत दिसून आलंय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक खरातचे एकनाथ शिंदेंनाही कॉल, उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका
अशोक खरातचे एकनाथ शिंदेंनाही कॉल, उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका
25 IAS Officers Transfer Of Maharashtra: मुंबईपासून, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगरपर्यंत...राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली, पाहा संपूर्ण यादी!
मुंबईपासून, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत...राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली, पाहा संपूर्ण यादी!
Pune Rain Update: पुण्यात पावसामुळे झाड कोसळून फूल विक्रेत्या महिलेचा करुण अंत, 20 वर्षांपासून सावली देणारं झाडचं काळ बनून आलं!
पुण्यात पावसामुळे झाड कोसळून फूल विक्रेत्या महिलेचा करुण अंत, 20 वर्षांपासून सावली देणारं झाडचं काळ बनून आलं!
Pune Rain Update : पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस

व्हिडीओ

Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Kalpana Kharat | गरिबीत पोरं वाढलेली, ती शाळेत पायी जायची, कल्पना खरातच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 एप्रिल 2026 | शुक्रवार
अयोध्येत बुरखा घालून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी तरुणी हिंदू निघाली; खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून लूट, 4 महिन्यांची गर्भवती, बॉयफ्रेंड राहुलसकट मुसक्या आवळल्या
अयोध्येत बुरखा घालून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी तरुणी हिंदू निघाली; खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून लूट, 4 महिन्यांची गर्भवती, बॉयफ्रेंड राहुलसकट मुसक्या आवळल्या
अमेरिका- इस्रायलचा फक्त इराण नव्हे आखाती देशातील सर्वात मोठ्या निर्माणधीन पुलावर दुसऱ्यांदा हल्ला; आता इराणने मध्य पूर्वेतील आठ प्रमुख पुलांची यादीच जाहीर करत नष्ट करण्याची दिली धमकी
अमेरिका- इस्रायलचा फक्त इराण नव्हे आखाती देशातील सर्वात मोठ्या निर्माणधीन पुलावर दुसऱ्यांदा हल्ला; आता इराणने मध्य पूर्वेतील आठ प्रमुख पुलांची यादीच जाहीर करत नष्ट करण्याची दिली धमकी
मिस्टर राज ठाकरे सर, नर्गिसने मानले मनसेप्रमुखांचे आभार; पोलिसांकडून अपेक्षाभंग, पण मनसैनिक मदतीला धावले
मिस्टर राज ठाकरे सर, नर्गिसने मानले मनसेप्रमुखांचे आभार; पोलिसांकडून अपेक्षाभंग, पण मनसैनिक मदतीला धावले
Rinku Singh : केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलला मागं टाकलं
केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलचा विक्रम मोडला
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगवान, NATM पद्धतीने होतोय 21 किमीचा बोगदा
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगवान, NATM पद्धतीने होतोय 21 किमीचा बोगदा
Embed widget