एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन पक्ष लोप पावणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा

Prithviraj Chavan on Maharashtra Politics, Satara : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल होतील.

Prithviraj Chavan on Maharashtra Politics, Satara : "लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल होतील. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी तीन असे सहा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीनंतर यातील दोन पक्ष लोप पावतील. एक तर ते दोन पक्ष मर्ज होतील किंवा संपुष्टात येतील", असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उदयनराजेंना तीन वेळा आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून दिलं. मात्र मागच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला साथ दिली. त्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही 90 हजार मतांनी त्यांचा पराभव केला. दोन पक्ष असताना 90 हजार  मतांनी पराभव झाला होता. आता तीन पक्ष आहेत त्यामुळे किमान दीड लाख मतांनी त्यांचा पराभव होईल. साताऱ्यातील उमेदवार हे दक्षिण भागातील चांगला चालतो. मात्र यावेळी दोन्हीही उमेदवार उत्तर भागातले आहेत.

बारामतीबद्दल काय म्हणाले चव्हाण? 

बारामतीमध्ये संघर्ष आहे. मात्र, शरद पवारांनी बारामतीला देशाच्या नकाशावरती नेलं. त्याबद्दल लोकांमध्ये कृतज्ञतेची भावना आहे. शरद पवारांच्या आदेशानुसार अजित पवारांनी काही काम केले असतील. पण शरद पवार नसते तर अजित पवार कुठे असते असा प्रश्न लोक आता विचारतात. बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टरवरून गायब करून अजित पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांचेच फोटो आहेत, असे निरिक्षणही चव्हाण यांनी नोंदवले. 

विशाल पाटलांबद्दल पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले? 

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, विशाल पाटील यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्यायच किंवा नाही? काय कारवाई करायची? हा आता शिस्तभंग समितीचा अधिकार नाही, तर नाना पटोले आणि प्रभारी यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने बहुमत मिळेल, असे चित्र आहे. 25 ते 26 जागा मिळेल असा अंदाज होता. मात्र आजचा जो रिपोर्ट आहे तो महाविकास आघाडीला अनपेक्षितपणे आणखी यश मिळेल असा रिपोर्ट आहे.

विदर्भात दहापैकी नऊ आमच्या जागा येतील

आम्ही नाना पटोले, प्रभारी आणि शरद पवार यांच्याशी एक तास चर्चा केली सर्वांचं म्हणणं आहे की, अनपेक्षितपणे महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल. उत्तर महाराष्ट्रातही चांगल्या जागा येथील असं शरद पवारांचं म्हणणं आहे. मोदींना आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी घेऊन ते बोलत आहेत. न पटणाऱ्या आणि डोकं चक्रावून जाईल, अशा गोष्टी मोदी करत आहेत. विदर्भात दहापैकी नऊ आमच्या जागा येतील. एक जागा मी भाजपला सोडतोय. गडकरींच्या जागेवरही खूप टफ फाईट होईल, असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, आणखी एका सहकाऱ्याने साथ सोडली, शिंदे गटात प्रवेश करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Karnataka High Court : घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Aadhar Card link : लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसं करायचं? New UpdateTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा: 23 August 2024HC on Mumbai Band : कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही- हायकोर्टाचे निर्देश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Karnataka High Court : घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
Embed widget