![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला, देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
ज्या भारतीय सैनिकांनी मायनस तापमानात चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले, त्यांचा अपमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला : देवेंद्र फडणवीस
![मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला, देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार Devendra Fadnavis attacks Maharashtra CM Uddhav Thackeray over indian army मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला, देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/03232219/WhatsApp-Image-2021-03-03-at-5.48.11-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपवर चौफेर टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला आहे. मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान आहे. चीनसमोर पळ काढला हे मुख्यमंत्री म्हणाले, हा सैनिकांचा अपमान आहे, उणे 3 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय सैन्य चीनशी लढले, एक इंचही भूमी चीनला मिळू दिली नाही, चिनी सैनिकांना मागे जावं लागलं. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं. मात्र, अशा सैनिकांचा मुख्यमंत्र्यांनी अपमान केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
“मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती नाही, त्यांनी अज्ञानातून भाषण केलं. जे खंडणी वसुली करतात, त्यांना राम मंदिरासाठी जनतेने केलेल्या समर्पणाची किंमत काय? मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांनी औरंगाबादचं नामांतर करुन दाखवावं, त्यांच्याकडून हे शक्यच नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांच्या बोलण्यातील महत्वाचे मुद्दे :
- शर्जील उस्मानी हा उत्तर प्रदेशातील आहे, पण त्या शर्जीलचं हिंदूविरोधात बोलण्याचं यूपीत धाडस नाही, तो महाराष्ट्रात येऊन बोलून जातो, त्याच्या केसाला हात लावायची या सरकारची हिम्मत नाही.
- गृहमंत्री अमित शाह यांनी कोणताही शब्द दिलेला नव्हता. खोटं बोल पण रेटून बोल, हे नवं रुप पाहायला मिळालं.
- सावरकरांना भारतरत्न नाही, पण सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.
मोटेरा स्टेडियमच्या नामकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
- संभाजीनगरबाबत हास्यास्पद वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कंटेट असेल तर प्रतिक्रिया देता येते.
- शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नव्हती. पण डॉ. केशव हेडगेवार संघाचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी होते, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही.
- जसं सरकारने राज्यपालांना दिलेलं भाषण महाराष्ट्राला दिशा देणारं नव्हतं, तसंच मुख्यमंत्र्यांचं चौकातलं भाषण होतं.
- कोव्हिडबाबत आम्ही मांडलेल्या मुद्द्याला एकही उत्तर मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत.
- राष्ट्रद्रोह म्हणता, आम्ही त्यांच्यावर टीका केली तर महाराष्ट्रद्रोही, तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर महाराष्ट्रद्रोही, अरे पण भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)