एक्स्प्लोर

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची हजेरी, नागपुरात मुसळधार

नागपूर/मुंबई : नागपुरात झालेल्या तुफान पावसाने रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. या पाण्यात अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालं. सकाळी साडे आठ ते दुपारच्या अडीच दरम्यान नागपुरात तब्बल 111 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे. छत्रपती नगर, नरेंद्र नगर, मनिष नगर तसंच त्रिमूर्ती नगरच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. कालही नागपुरात दमदार पाऊस झाला होता. शहराबरोबरच ग्रामीण भागातही चांगला पाऊस झाल्याने पेरण्यांना गती मिळणार आहे. दरम्यान पुढचे दोन ते तीन दिवस नागपुरात असाच पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. मुंबईत पावसाची संततधार कायम मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आली. त्यावेळी उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांचा अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी चौपाट्यांवर गर्दी केली होती. मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. अंधेरी, पवई, कांजुरमार्ग, घाटकोपर आणि वांद्रे परिसरात संततधार कायम आहे. सकाळी काही वेळ पावसाने उसंत घेतली. पहाटेपासून झालेल्या पावसाने हिंदमाता, किंग्ज सर्कल, पवई आणि सायन परिसरात पाणी साचलं होते. उत्तर महाराष्ट्रात पावसाची हजेरी उत्तर महाराष्ट्रात मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तर धुळे जिल्ह्यातही तब्बल 20 दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उत्तर महाराष्ट्रात केवळ नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. नंदुरबार वगळता नाशिक, धुळे, जळगाव या भागांमध्ये चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मराठवाड्यात पावसाची दांडी सुरुवातीला जोरदार बरसलेल्या वरुणराजाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. मराठवाड्यातील जवळपास आठही जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कारण अनेक ठिकाणी पेरणी झालेली आहे, मात्र पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे. नांदेड शहरात दुपारी थोडा वेळ पाऊस झाला. मात्र ग्रामीण भागात पावसाने पाठ फिरवली आहे. कोल्हापुरात जोरदार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सतत कोसळत असलेल्या पावसाने चार बंधाऱ्यांचा पाणीसाठा वाढला आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 19 फुटांवर गेली आहे. चंदगड, गगनबावड्यातही जोरदार पाऊस बरसला. भरतीमुळे कोकण किनारपट्टीचं नुकसान कोकणच्या किनारपट्टीचं भरतीमुळे मोठं नुकसान झालं आहे. किनारपट्टीवरील बायागती समुद्राने आपल्या पोटात घेतली आहे. रत्नागिरी-गुहागरच्या वेळणेश्वर किनाऱ्यावरील संरक्षक भिंतीनाही लाटांचा तडाखा बसला. वेळणेश्वर,पट्ट्यासोबतच मिऱ्या, मांडवी, देवबागच्या समुद्रकिनाऱ्यालाही लाटांचा तडाखा बसला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, रोहा या भागांमध्येही चांगला पाऊस सुरु आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
Ganesh Naik : आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो, गणेश नाईक यांचं वक्तव्य चर्चेत
आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो : गणेश नाईक
दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते आणि सदनात चक्कर टाकून त्याठिकाणी तो स्तंभ स्थिर करते, हा निर्णय कुणी घेतला याची चर्चा  होत नाही : शरद पवार
संविधानासमोर डोकं ठेवलं की लोकशाही जतन करण्याच्या जबाबदारीतून मुक्त झालो असा विचार राज्यकर्ते करतात : शरद पवार
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
Ganesh Naik : आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो, गणेश नाईक यांचं वक्तव्य चर्चेत
आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो : गणेश नाईक
दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते आणि सदनात चक्कर टाकून त्याठिकाणी तो स्तंभ स्थिर करते, हा निर्णय कुणी घेतला याची चर्चा  होत नाही : शरद पवार
संविधानासमोर डोकं ठेवलं की लोकशाही जतन करण्याच्या जबाबदारीतून मुक्त झालो असा विचार राज्यकर्ते करतात : शरद पवार
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
CBSE Date Sheet : सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार  
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार
Asaram Bapu : शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
Embed widget