एक्स्प्लोर

Nashik News : गाव तसं चांगलं, पण विकायला काढलं, माळवाडी गाव विकणे आहे, काय नेमकं प्रकरण? 

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावाने थेट गाव विक्रीला काढले आहे.

Nashik News : रात्रंदिवस मेहनत करून, पोटाला चिमटा मारून, शेती करून पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहे. राज्यभरात मागील काही दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. आता हे लोन गावागावात पोहचले आहे. अशातच देवळा (Deola) तालुक्यातील माळवाडी (Malwadi Village) येथील ग्रामस्थांनी सरकारच्या धोरणाला निषेधार्थ ‘ गाव विकणे आहे’, असा बोर्ड ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावला. गाव विक्री काढलेल्या या ग्रामस्थांनी राज्य सरकारला गाव विकत घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांदा दरातील घसरण, सरकारचे शेतकरी (Farmers) विरोधी धोरण शिवाय गेल्या अनेक वर्षात शेती मालाला मिळत नसलेला भाव यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावाने थेट गाव विक्रीला काढले आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून शेती मालाला भाव मिळत नसल्याने गावातील शेतकरी चांगलेच वैतागून गेले आहेत. त्यामुळे गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत गाव विक्रीसंदर्भात ठरावच केला असून  शासनाकडे गाव विकण्याबाबतचा ठराव पाठविण्यात येणार आहे. गावकऱ्यांच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे जिल्ह्यात माळवाडी गावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

नाशिकच्या (Nashik District) देवळा तालुक्यातील ग्रामस्थांची सरकारकडे गाव विकत घेण्याची मागणी केली आहे. आत्महत्या करण्यापेक्षा जमीन विकून सुखी जीवन जगता येईल अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. माळवाडी गाव हे हजार दोन हजार लोकवस्तीचं गाव. येथील गावकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. जवळपास 534 हेक्टरवर शेती व्यवसाय करत आहेत. यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचे घेतले जात आहे. मात्र गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोणत्याही शेती उत्पादित मालाला भाव मिळत नसल्यानं ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. त्यामुळे थेट ठराव एकमताने केला असून गाव विक्रीला काढले आहे. गावकऱ्यांच्या या निर्णयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

गावकऱ्यांचं म्हणणं काय? 

गावकऱ्यांचं म्हणणं काय तर? रोजच्या जगण्यासाठी लागण्याऱ्या वस्तू, मुलांची शाळा, कुटुंब चालविणे अवघड झाले आहे. शेती करून काहीच भागत नाही. अनेक वर्षांपासून शेती करत असून पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने लागवड, उत्पादन खर्चही सुटेनासा होत आहे. बँकांचे कर्ज, सावकारांचे कर्ज फिटेनासे झाले आहे. वावर गहाण ठेवून शेती केली जात आहे. मात्र उत्पन्न शून्य असल्याने आता पर्याय उपलब्ध नसल्याने संपूर्ण माळवाडी गाव विकण्याचा ठराव गावात सभा घेऊन पास केला आहे. संपूर्ण गावकरीच गाव विकण्याच्या मनस्थितीत आले आहेत. शेतीवर आधारित असलेल्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कर्जफेड करण्याइतपत उत्पन्न मिळावे, सरकारने दखल घ्यावी शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे. ते सरकारनेच विकत घ्यावे अशी मागणी देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

गाव विकण्याचाच पर्याय 

गेल्या पाच वर्षांपासून शेती मालाला भाव नाही, अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान होत आहे. याबरोबरच शेतकरी धोरण राबविताना शेतकऱ्यांच्या धोरणांचा विचारच होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. म्हणून गावात राहून खितपत पडण्यापेक्षा गाव विकून बाहेर कुठेतरी निघून जावे, यासाठी आम्ही गाव विकण्यासाठी काढले आहे. सरकारने शेतकऱ्याना न्याय द्यावा, अशी वेळ कुणावरही येऊ नये, म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी निदान पिकाला योग्य भाव देण्याचे नियोजन करावे, अन्यथा गाव विकण्याचाच पर्याय असल्याचे गावकरी सांगतात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget