एक्स्प्लोर

शेतकरी हवालदिल, पाणी टंचाईसह चारा टंचाई, नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, पालकमंत्री दादा भुसे यांची मागणी

नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात येवून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात यावी अशी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

नाशिक :  नाशिक (Nashik News) जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातही पाण्याच्या अभावामुळे पुरेशा पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ (Drought)  जाहीर करण्यात येवून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात यावी अशी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)  यांनी केली आहे.

नाशिक जिल्हृयात कमी झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जनावरांच्या चारा टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम थेट शेतीवर देखील झाला आहे. अनेक पिकांचे उत्पादन घटल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यात सुहास कांदे, दिलीप बोरसे, मंत्री डॉ. भारती पवार आदींनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. आता थेट पालकमंत्री दादा भुसे यांनीच ही मागणी लावून धरली आहे. 

दुष्काळ जाहीर करा 

नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून पालकमंत्री दादा भुसे यांनी दुष्काळ जाहीर करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पत्रान्वये मागणी केली आहे. तसेच याबाबत गांभीर्याने विचार करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रत्यक्ष भेटून मागणी करणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.

दुष्काळी भागात केंद्रीय पथकाची पाहणी 

नाशिक जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने शेतीची बिकट परिस्थिती पहायला मिळत आहे. अपुऱ्या पावसात जीवाचं रान करून शेती पिकवली, मात्र उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.  याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती पाहणी केली. नाशिकच्या काही भागांमध्ये दौरा करत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. उपस्थित अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत केंद्राला तसा अहवाल पाठविण्यात येईल असे सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कळवण-नाशिक मार्गावर भीषण अपघात, दोन बसची समोरासमोर जोरदार धडक, वाहतूक ठप्प 
कळवण-नाशिक मार्गावर भीषण अपघात, दोन बसची समोरासमोर जोरदार धडक, वाहतूक ठप्प 
Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार
बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार
इराण इस्रायल युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही, द्राक्ष बागायतदार संघाची माहिती, सध्या किती मिळतोय बाजारभाव? 
इराण इस्रायल युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही, द्राक्ष बागायतदार संघाची माहिती, सध्या किती मिळतोय बाजारभाव? 
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget