(Source: ECI / CVoter)
Kisan Sabha Protest : ...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; नाशिकमधील आंदोलक शेतकऱ्यांचा निर्धार
Nashik News : माकप आणि किसान सभेच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला असला तरी शेतकरी मात्र आंदोलनावर ठाम आहेत.
Kisan Sabha Protest नाशिक : माकप आणि किसान सभेचे (Kisan Sabha Protest) गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Nashik Collector Office) आंदोलन सुरु आहे. मात्र शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला आहे. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील आंदोलन सुरूच राहणार आहे, असे शिष्टमंडळाने जाहीर केले आहे.
त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले माकपाचे आंदोलन लवकरच संपणार असल्याची चिन्ह आहेत. वनजमीन हक्काच्या विविध तीन मुद्यांसह कांद्याचा हमी दर, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, आशा व अंगणवाडी सेविकांना किमान वेतन लागू करण्याच्या मागणी अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी सुरगाणा ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा हजार आदिवासी व शेतकरी बांधवांचा मोर्चा आला होता. सोमवारी हा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मुख्य रस्ता बंद झाल्याने नाशिककर त्रस्त
या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे दोन्ही मार्ग व्यापल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मुख्य रस्ताच बंद झाल्याने नाशिककरही त्रस्त झालेत. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पालकमंत्री, महसूलमंत्री यांनी बैठका घेत प्रयत्न केला. मात्र, आंदोलनावर तोडगा न निघाल्याने सीबीएस ते अशोक स्तंभ या मार्गावर हजारो आंदोलकांचा मुक्काम कायम होता.
...तोपर्यंत मुक्काम हलविणार नाही
शुक्रवारी रात्री उशिरा या आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मिळत नाही तोपर्यंत मुक्काम न हलविण्यावर आंदोलक ठाम आहेत. आंदोलकांनी ठाण मांडल्यामुळे शहराचा मुख्य स्मार्ट रोडच जाम झाला आहे. याच मार्गावर कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय आहे. त्यामुळे नागरिकांना याठिकाणी ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने आंदोलकांच्या आरोग्याच्या समस्येत वाढ होताना दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय
त्यातच सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. हे सर्व कमी म्हणून की काय अचानक सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनीही संपाची हाक दिल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय झाली. विद्यार्थ्यांना आणून घालण्यासाठी पालकांना स्वतः यावे लागत असल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा
Nashik Citylink Bus Strike : ...अखेर सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप मिटला, शहरातील बससेवा पूर्ववत