एक्स्प्लोर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना 'राज्य अतिथी'चा दर्जा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Wardha Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: वर्ध्यात होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्धाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : समाजाला भेडसावणारे मुद्दे, त्याविषयी वाटणारी तळमळ आणि सामाजिक जाणीव यातून एक उत्तम आणि जबाबदार साहित्यक जन्मला येतो अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या वतीने वर्धा (Wardha) येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरीमध्‍ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याशिवाय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना 'राज्य अतिथी'चा दर्जा देण्याचे निवेदन मान्य केल्याची घोषणा त्यांनी केली. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाच्या  पटांगणात साहित्‍य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी  साहित्‍य नगरी सजली आहे.
 
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन कायम साहित्यिक मंडळींच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी अनेक विकास कामे होत आहे. अशा विकास कामांचा उल्लेख देखील साहित्यकांनी आपल्या रचनांमध्ये करावा असे ते म्हणाले. याशिवाय ग्रामीण भाषा, बोली भाषा संवर्धनासाठी शासन प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील थोरामोठांच्या यशोगाथा अधिक व्यापक स्वरूपात पुढे आणता येतील का, चांगल्या परदेशी साहित्याचा अनुवाद केल्या जाऊ शकेल का अशा मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.

संमेलनाचे अध्यक्ष न्या, चपळगावकर यांनी थोडक्यात व्यक्त केलेल्या मनोगतात विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. नुकत्याच शासन आयोजित साहित्य संमेलनाबाबत बोलताना त्यांनी असे आयोजन स्वायत्त संसथा यांच्या मार्फत व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुरवातीला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी मनोगत व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष  दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा देऊन साहित्य परंपरा जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे यांनी  साहित्य संमेलन सर्वार्थाने फलद्रुप व्हावे अशी आशा  व्यक्त केली आणि या संमेलनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि साहित्य प्रेमींचे स्वागत  केले. यावेळी त्यांनी वर्धा आणि साहित्ययिक परंपरा याबद्दल  विविध आठवणींना उजाळा दिला. 

साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्‍यासपीठावर मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी कार्यक्रमाला राज्‍याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक न्‍या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्‍याक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक भारत सासणे, स्‍वागताध्‍यक्ष दत्‍ता मेघे यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्‍वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्‍वास, खासदार, जिल्ह्यातील आमदार,तसेच आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय महामंडळाच्‍या अध्‍यक्ष प्रा. उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची उपस्थिती होती.

समाजाला पुन्हा पुन्हा महात्मा गांधींच्या विचाराकडे यावे लागेल

त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी वर्ध्याच्या साहित्य संमेलनाचे विशेष महत्व विशद केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजन , नियोजनासाठी 2 कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मावळते अध्यक्ष सासणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाजाला पुन्हा पुन्हा महात्मा गांधींच्या विचाराकडे यावे लागेल. गांधींचे विचार हे कायमच दिशा दर्शक असल्याचे ते म्हणाले. त्यापूर्वी त्यांच्या कार्यकाळातील कार्यांचा त्यांनी आढावा घेतला आणि त्यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

सूत्र प्रदान सोहळा 

मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत ससाणे यांनी अध्यक्षपदाची सूत्र विद्यमान अध्यक्ष  न्या. चपळगावकर यांना  दिली. यानंतर विदर्भ साहित्य संघ शताब्दी विशेष अंक 'दौत लेखणी ' चे विमोचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते झाले. 

ही बातमी देखील वाचा...

मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
BJP on Rahul Gandhi: राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pawar Politics: 'भाजपसोबत जाऊ नका', Sharad Pawar यांचा आदेश; Ajit Pawar गटासोबत युतीचे संकेत?
Rohit Pawar EXCLUSIVE : स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
Uddhav Thackeray Dharashiv : 'शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही, पाठीत खंजीर खुपसला', सरकारवर घणाघात
Rahul Gandhi on Haryana Vote Chori: 'हरियाणातील सरकार चोरीचे, मुख्यमंत्री चोरांचे'
Uddhav Thackeray Marathwada : कर्जमुक्ती नाही, तर सरकारला मत नाही, ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
BJP on Rahul Gandhi: राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
Video: 'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
Raigad Accident News: वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
Embed widget