एक्स्प्लोर

मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या समस्यांवर बोलण्याची गरज असताना सरकार कशी पाडली आणि आपण मुख्यमंत्री कसे बनलो हे सांगतात, अशी टीकाही यावेळी आंदोलकांनी केली.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : वर्धा (wardha) येथे आजपासून सुरु झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत असतांनाच विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. यावेळी महिलाही आक्रमक दिसून आल्या. 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री भाषण देत होते. दरम्यान प्रेक्षकांमधून अचानक महिला आणि पुरुषांनी वेगळा विदर्भ झालाच पाहीजे, शेतकरी आत्महत्या थांबल्याच पाहीजे, बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत आहेत. त्या तरुणांच्या आत्महत्या थांबल्याच पाहीजे अशा घोषणा देणे सुरु केले.

यावेळी उपस्थित पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटलं की, राज्याचे मुख्यमंत्री फक्त फित कापण्यात व्यस्त आहेत. तसेच सरकार स्थापन करुन खूप मोठी कामगिरी केल्याचे दाखवत आहेत. मात्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. मुख्यमंत्री भाषण सुरु असताना विदर्भवाद्यांनी कागदं देखील भिरकावली. यावेळी विदर्भातील शेतकरी आत्महत्याकडे देखील लक्ष वेधले गेले. यावेळी झालेल्या गोंधळात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

शिंदेसाहेब या मुद्द्यांवरही बोला: आंदोलकांचा आक्रोश

विदर्भातही शेतकरी आत्महत्या करत आहे. दुसरीकडे वेगळा विदर्भ राज्य करुन विदर्भातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा. देशासह राज्यात वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुणाई नैराश्यात जात आहे. त्या नैराश्यातून तरुण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी या विषयांवर बोलण्याची गरज असताना सरकार कसं पाडलं आणि आपण मुख्यमंत्री कसे बनलो हे सांगतात, अशी टीकाही यावेळी आंदोलकांनी केली.

वर्ध्यामध्ये (Wardha) आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Marathi Sahitya Sammelan) आज पहिलाच दिवस आहे. मात्र, हा पहिलाच दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळं चर्चेत आला आहे. मराठी साहित्य संमेलनात तिसऱ्यांदा हा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आणि या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळं सभामंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, यावेळी विदर्भवादी महिलांही आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या.

ही बातमी देखील वाचा...

Cyber Attack : सैन्यासाठी स्फोटक बनवणाऱ्या नागपुरातील सोलर समूहाला खंडणीसाठी ई-मेल; 'डार्क वेब'वर डेटा विक्रीसाठी उपलब्ध? युद्धपातळीवर तपास सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
Embed widget