एक्स्प्लोर

RSS | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे 300 किल्ले होते. मात्र, एकाही किल्ल्यावर किल्लेदार म्हणून महाराजांनी एकही नातेवाईक नेमला नव्हता, असे मत त्यांनी मांडले.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी आज घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे हा टोला नेमका कुणाला होता याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे 300 किल्ले होते. मात्र, एकाही किल्ल्यावर किल्लेदार म्हणून महाराजांनी एकही नातेवाईक नेमला नव्हता. कारण शिवाजी महाराज जबाबदारीचे वाटप करताना नात्यांपेक्षा गुणवत्तेला महत्व देत होते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे. सरकार्यवाह भैय्याजी जोशी आज हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह व्याख्यानात बोलत होते. जे शिवाजी महाराजांनी तेव्हा केले ते आजही झाले पाहिजे, अशी आठवणही सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी करून दिली. मात्र, राजकारणात नाते संबंधांपेक्षा गुणवत्तेला महत्व दिले पाहिजे अशी आठवण सरकार्यवाह यांनी नेमकी कोणाला करून दिली याची चर्चा आता सुरु होण्याची शक्यता आहे. Coronavirus | पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती शिवराज्याभिषेक दिन हिंदु साम्राज्य दिनाच्या स्वरूपात  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु साम्राज्य दिनाच्या स्वरूपात साजरा करतो. राज्य कसे चालवलं पाहिजे, राज्य व्यवस्था कशी असली पाहिजे याची एक ब्लूप्रिंट शिवाजी महाराज देऊन गेले आहे. त्यामुळे आज ज्यांना शासन व्यवस्था चालवायची आहे. त्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या शासन व्यवस्थेला समजून घेण्याची गरज असल्याचेही सरकार्यवाह म्हणाले. एवढेच नाही तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे महत्व इंग्रजांनीही ओळखले होते. जर शिवाजी महाराज आणखी 5 ते 6 वर्ष जगले असते. तर कदाचित भारतावर इंग्रजांचे राज्य आलं नसतं असे इंग्रज सैन्यातील अधिकारीही मान्य करायचे, अशी आठवणही सरकार्यवाह यांनी करून दिली आहे. Sunil Tatkare on Nisarg | रायगड जिल्ह्याला कोणतेही निकष न ठेवता मदत करावी : सुनिल तटकरे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2026: गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?
गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?
Commercial CNG Gas Nagpur: अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
Nagpur Crime News: लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
Iran vs Israel War: इराणकडे आणखी किती क्षेपणास्त्रांचा साठा, रशियाने महिनाभरापूर्वीच मोठी रसद पाठवली, युद्धाबाबत संरक्षण तज्ञ अभय पटवर्धनांचं महत्त्वाचं भाकीत
इराणकडे आणखी किती क्षेपणास्त्रांचा साठा, रशियाने महिनाभरापूर्वीच मोठी रसद पाठवली, युद्धाबाबत संरक्षण तज्ञ अभय पटवर्धनांचं महत्त्वाचं भाकीत

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget