एक्स्प्लोर

फडणवीस सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली : प्रकाश शेंडगे

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सभागृहात बोलताना मराठा समाज हा एसईबीसीमध्ये आल्याचं म्हंटल आहे. त्यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. याबाबत माजी आमदार प्रकाश शेंडगे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आणि मराठा हे प्रवर्ग वेगळे असतील असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु, काल सभागृहात बोलताना पाटील यांनी मराठा समाज हा एसईबीसीमध्ये आल्याचं म्हंटल आहे. चंद्रकात पाटील यांच्या याच वक्तव्यावर आता ओबीसी समाजाने आक्षेप घेतला असून ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. याबाबत माजी आमदार प्रकाश शेंडगे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी. नेमकं काय आहे प्रकरण? निवडणुकी पूर्वी चंद्रकांत पाटील यांनी आम्हांला आश्वासन दिलं होतं की, मराठा समाजला आरक्षण देताना या आरक्षणाचा कोणताही फटका ओबीसी समाजाला बसणार नाही. मराठा समाजाचा प्रवर्ग वेगळा असेल. परंतु, आता चंद्रकात पाटील यांनी सभागृहात बोलताना मात्र मराठा समाज ओबीसी समाज झाल्याचं वक्त्यव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने वोट बँकेवर डोळा ठेवून आम्हांला आश्वासन दिलं आणि आमची फसवणूक केली. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील. त्यामध्ये मराठा समाज ओबीसीमधुन निवडणूक लढवू शकतो? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत असं होऊ शकतं आणि याचीच आम्हांला भीती आहे. अशा वेळी उमेदवारांना रोखता देखील येऊ शकणार नाही. फडणवीस सरकारने खोटं बोलून ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. आम्ही आरक्षणाच्या वेळी ही वारंवार सांगत होतो. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आम्हांला आश्वासन देऊन आमची फसवणूक केली भाजपमध्ये असणारे ओबीसी नेते बोलत नाहीत? पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची अवस्था भाजपने बिकट केली आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की हा प्रश्न एका पक्षाचा नाही. हा सर्व ओबीसी समाजचा प्रश्न आहे. यासाठी मी सर्व पक्षातील नेत्यांना एकत्र येण्याचं आव्हान करणार आहे. तसेच याविरोधात आंदोलन देखील उभारणार आहे. नवीन मुख्यमंत्र्याकडे काय मागणी करणार आहात? निवडणुकीच्या आधी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलं होतं की आपलं सरकार आल्यानंतर आपण धनगर आरक्षणाचा आणि ओबीसी समाजाचा प्रश्न मार्गी लावू. आता आम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहोत. आमच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष्य वेधणार आहोत. तसेच मागण्यांचे निवेदन देखील त्यांना देणारं आहोत. हा घोळ सोडवला नाही तर राज्यात ओबीसी समाजाचे मोठे आंदोलन उभे राहिलं. मागील सरकारने धनगर आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं? नेमकं काय झालं? बारामतीला जे मोठं आंदोलन आम्ही उभारलं होतं त्यावेळी फडणवीस यांनी आम्हांला सरकार आलं की लगेचच आरक्षणाचा निर्णय आम्ही घेऊ असं आश्वासन दिलं. आम्ही देखील त्यांच्या आश्वासनाला बळी पडलो. परंतु, सरकार आल्यानंतर मात्र यांनी आमच्या मानगुटीवर टिस्स नावचं भूत लादलं. या संस्थेचा अहवाल येण्यातचं पाच वर्षे कशी निघून गेली हे आम्हांला कळलं नाही. शेवटी केवळ यांनी 1 हजार कोटींचा तुकडा समाजासमोर टाकला. परंतु, त्यातून काहीच आमच्या पदरी पडलं नाही. केवळ कागदी घोडे रंगवण्यात आले. एनआरसीचा मुद्दा राज्यात सुरू आहे. यावरुनच पुढचा प्रश्न आहे. राज्यात अनेक उपेक्षित समाज आहे, ज्यांचे आजही जन्माच्या नोंदी नाहीत. त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? राज्यात माकडवाले, अस्वल वाले, ज्योतिष सांगणार, मेंढपाळ अशा अनेक दुर्लक्षित समाजाचे लोकं राहतात. यांच्या कसल्याही सरकार दफ्तरी नोंदी नाहीत. सरकार यांच्या बाबतीत काय निर्णय घेणार हा प्रश्न आहे. उद्या राज्यात हा कायदा लागू झाल्यास सरकार या लोकांना हाकलवून लावणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आता आम्ही देशभरातील सर्व ओबीसी समाज एकत्र येणार आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र देऊन आमच्या प्रश्नाकडे लक्ष्य वेधणार आहोत. हेही वाचा - कॅग अहवालाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीतील मतभेद सभागृहात उघड, नवाब मलिकांनी जयंत पाटलांना टोकले BJP | भाजप ओबीसी मोर्चाची बैठक, एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंना आमंत्रण| ABP MAJHA
ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Embed widget