एक्स्प्लोर

शिवरायांचं नाव घेऊन खंडणी गोळा करणारी आमची औलाद नाही: उद्धव ठाकरे

मुंबई: शिवरायांचं नाव घेऊऩ खंडणी गोळा करणारी आमची औलाद नाही तर तुमचीच असेल, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. मुंबईतल्या दहिसरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदींवरही टीका केली. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपचे मंत्री सुभाष देशमुख म्हणतात,  गुंडांना घेणार आणि मग त्यांना सुधरवणार, मग मंत्रालयाला काय गुंडालय म्हणायचं का? असा सवाल विचारत, गुंडांसाठी नवीन मंत्रालय सुरु करुन गुंडा मंत्री असं त्याचं नामकरण करा, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेवर होणाऱ्या घोटाळ्याच्या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,  ''#didyouknowच्या माध्यमातून केलेली कामं ठासून सांगतो आहे. नालेसफाई केलेली या नालायकांना दिसणारच नाहीत. रस्त्याखालचे जलभोगदे सुमारे 100 किमीचे बांधले. जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून मुंबईकर निवडून देतात. केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालातही मुंबईतल्या कामांचं कौतुक केलंय. त्याला चुकीचं ठरवून तुम्ही स्वतः मोदींवर टीका करत नाही का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. तसेच मुख्यमंत्री पदावर बसल्याने आरोप करताना जबाबदारीने करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना दिला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंहांवर टीका करताना, मनमोहन सिंह रेनकोट घालून अंघोळ करतात, असं म्हंटलं होतं. यावर राहुल गांधी म्हणाले की, त्यांना बाथरूममध्ये डोकावून पाहण्याची सवय आहे. पण माझ्या बाथरूममध्ये कधी डोकावून पाहायला नाही आले, अशी हिम्मतही ते कधी करणार नाहीत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील इतरही मुद्दे
  • पश्चिम उपनगरात सभेला यायचं म्हंटलं कि, वेळे आधी निघायचं म्हणजे कधी निघायचं हेच कळत नाही. किती ही लवकर निघालो तरी वाहतुककोंडीमुळे उशीर होतोच.
  • कोस्टल रोडला केंद्राने परवानगी दिली असती तर हे होणार नाही
  • या मुंबईचा मला अभिमान आहे, मुख्यमंत्र्यांना नसेल अभिमान. त्यांना मुंबईशी काही देणं नाही, फक्त घेणं आहे
  • मुंबई पटण्यासारखी झाली म्हणे, काही पटण्यासारखं तरी बोला
  • आम्ही केलेल्या कामांवर जळफळाट करू नका.
  • ठाण्यात उत्स्फूर्त पणे गाजर वाटली कारण हे गाजरच वाटत सुटलेत
  • वीज निर्मिती केंद्राची परवानगी 6 महिन्यांपूर्वी देऊ असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं
  • पारदर्शकतेने सांगा आजपर्यंत ही फाईलला हल्ली नाही
  • हिम्मत असेल तर मुंबई महापालिकेप्रमाणे केंद्रात आणि राज्यात ही पारदर्शकता आणा
  • केवळ मुंबई हिसकावून घ्यायची म्हणून आमच्यावर चिखलफेक करता?
  • आत रात्री थोडी सोंगं फार अनेक जण येतील मतं फोडण्याचा प्रयत्न करतील
  • मीच मुंबईकर हे आम्हाला सांगायचा गरज लागत नाही.
  • मुंबईकर आम्हाला चांगला ओळखून आहे आणि तुम्हाला ही ओळखून आहे.
  • मुंबईची मेट्रो तुम्ही नाही केली, काँग्रेसने केलंय. मुंबईचा सागरी मार्ग तुम्ही माही शिवसेना करणार.
  • मी आणि आदित्य तुमच्या समोर उभा आहे. घराणेशाही म्हणा किंवा परंपरा म्हणा हवं तर.
  • आमच्या चार पिढ्या मुंबईच्या सेवेसाठी राबल्या आणि कोणी ही ऐरागैरा येईल त्याला फसू नका

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, पण पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता कमीच, नेमकं कारण काय?
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, पण पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता कमीच, नेमकं कारण काय?
Disha Salian Case FIR Ragister By CBI: दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन पानांचा FIR, तर 7 पानांचा जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी करणार
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा संपूर्ण FIR, वडिलांचा 7 पानी सनसनाटी जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंना चौकशीला बोलावणार?
Sanjay Raut on Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नाही; FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नाही; FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Patil: 'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
Rain Update: बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
Sangali News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा , एक अधिकारी अन् कर्मचारी आजपासून असणार सोबत
मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा , एक अधिकारी अन् कर्मचारी आजपासून असणार सोबत
Meta News : ऑनलाइन सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटा बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमत
सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटाचा मोठा निर्णय; बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमती
NSE IPO: NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation : परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
Embed widget