एक्स्प्लोर

'या' दोन गोष्टींमुळेच कोरोनाची लाट आणि रोगाला रोखता येईल : डॉ. शेखर मांडे

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी वर्तवला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी वर्तवला आहे. 'एबीपी माझा'सोबत केलेल्या विशेष बातचीत दरम्यान डॉ. शेखर मांडे यांनी कोरोनाची लाट थांबवण्यासाठी लसीकरण आणि नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं म्हटलं.

जगाला दिशा दाखवण्याची महाराष्ट्राकडे संधी : डॉ. मांडे
डॉ. शेखर मांडे म्हणाले की, "इतिहासात जेव्हा जेव्हा भयानक संकटं समाजासमोर उभी राहिली होती, तेव्हा महाराष्ट्राने समाजाला दिशा दाखवली होती. आज ती घडी आपल्यासमोर आली आहे. दुसरी लाट थांबवायची असेल आणि रोगाला पूर्णपणे रोखायचं असेल तर दोन गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी लस घ्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे लसीकरणानंतरही कोरोनाविषयक नियमांचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे. हे जर केलं तर महाराष्ट्राला पुन्हा संधी आहे की जगाला दिशा दाखवायची."

सरसकट सगळ्याचं लसीकरण किती गरजेचं?
देशभरात सध्या कोरोना लसीकरण अभियान सुरु आहे. लसीकरणामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. लसीकरणाविषयी विचारलं असता डॉ. शेखर मांडे म्हणाले की, "लस घेणं सगळ्यांना आवश्यक आहे. जुने आजार असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणं आवश्यक होतं. आता 45 वर्षांवरील लोकांचं लसीकरण आवश्यक आहे. आपली उत्पादनाची क्षमता आणि उपलब्धता वाढेल तेव्हा सगळ्यांचंच लसीकरण होणं गरजेचं आहे. पण जे युवक आहेत, ज्यांचं वय 45 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांनी सतर्कता बाळगणं, मास्क लावणं आवश्यक आहे." 

कोणती लस चांगली? 
कोवॅक्सिन की कोविशील्ड कोणती लस घ्यावी याविषयी अनेकांमध्ये साशंकता आहे. "भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड या दोन्ही लस चांगल्या आहेत. सरकार जी लस देईल, ती घ्यायला हवी," असं डॉ. शेखर मांडे यांनी सांगितलं.

गाफिल राहिल्याचा परिणाम
"जेव्हा भारतातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असताना, परदेशात कोरोना वाढत होता. तिथे कोरोनाची लाट आली होती. या परिस्थितीत आपण गाफिल राहिलो. यात दोष संपूर्ण समाजाचा आहे, कारण आपण त्यांच्याकडून काही शिकलो नाही. त्यांच्याकडे आकडे वाढताना आपल्याकडे आकडे कमी होणार असं आपलं मत होतं," असं डॉ. मांडे यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रातच कोरोनाबाधितांची संख्या जास्त का आहे?
दरम्यान देशभरात महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या जास्त का आहे, असेही प्रश्न विचारले जात आहेत. याबाबत डॉ. शेखर मांडे म्हणाले की, "हा गंभीर मुद्दा आहे. याचं नेमकं कारण आपल्याला माहित नाही. महाराष्ट्र मोठा प्रांत आहे. पंजाब, दिल्लीमध्ये आकडे वेगाने वाढत आहेत. दिल्ली आणि पंजाब एकत्र केल्यास महाराष्ट्राएवढा प्रांत होता. त्याचा गुणाकार केल्यास पंजाब आणि दिल्लीतील आकडे हे महाराष्ट्राएवढे आहेत. इतर कारणं पण असू शकतात. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यासारखी मोठी शहरं आहेत. या शहरांमधील रहदारी जास्त आहे. नेमकी कारणं सांगणं कठीण आहेत, अनेक कारणं असू शकतात आणि ती बरोबरही असू शकतात."

सरकारचे निर्बंध योग्य आहेत?
"सरकार असे निर्णय घेतं, त्यामागे गंभीर विचार झालेला असतो. त्यामुळे ती शिस्त बाळगणं आवश्यक आहे," असंही मांडे यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
Embed widget