एक्स्प्लोर

वसईतील मिठागरात अडकलेल्या 400 जणांना बाहेर काढण्यास सुरुवात

मिठागरातील वस्तीमध्ये अडकलेल्या 400 जणांना बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कालपासून हे सर्वजण या परिसरात अडकून पडले आहेत.

वसई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात गेली दोन दिवस पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वसई, विरार, नालासोपारा या परिसराला बसला आहे. वसई पूर्व भागात असलेल्या मिठागरातील वस्तीमध्ये 400 जण कालपासून अडकून पडले आहेत. पावसाचा जोर कमी होईल म्हणून घर सोडून येण्याची त्यांची तयारी नव्हती.

मात्र, पावासाची संततधार कालपासून सुरुच असल्याने मिठागर परिसरातील पाण्याची पातळी आणखी वाढली. वस्तीतील लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. वसई-विरार महानगर पालिकेच्या अग्निशमन दल्याच्या कर्मचाऱ्यांनी मिठागरातील लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या 24 तासात वसईमध्ये 299 मिमी तर विरारमध्ये 235 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जागोजागी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेवर ट्रॅकवर पाणी साचल्याने बोरिवली-वसईदरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वे 30 मिनिटे उशिराने धावत आहे. शीव-माटुंगादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्याने फास्ट लोकल स्लो ट्रॅकवर वळवल्या आहेत. सायन-माटुंग्यादरम्यान लोकल अत्यंत धीम्या गतीने चालवण्यात येत आहेत.

पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिरा धावत आहेत. तर हार्बर रेल्वे 20 मिनिटे उशिरा आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर कुठेही पाणी तुंबल्याची स्थिती नाही, मात्र लोकलची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहेत.

ठाण्यातील साकेत पुलाला तडे मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर रस्त्याला तडे गेले आहेत. मुसळधार पावसामुळे जॉइन्ट्समधील डांबर वाहून गेल्यानं आजूबाजूला रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. पूल वाहतुकीसाठी धोकादायक अजूनही या पुलावरुन वाहतूक सुरु आहे. तडे गेलेल्या भागावर पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

वसईतील मिठागरात अडकलेल्या 400 जणांना बाहेर काढण्यास सुरुवात

ठाण्यातील तलाव भरले ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे ठाण्यातले तलाव भरु लागले आहेत. ठाण्याचा मासुंदा तलाव, जेल तलाव, कचराळी तलाव, मखमली तलावांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात या तलावांची पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती. येत्या पाच दिवसात ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे ठाण्यातले तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment: व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
Harshwardhan Sapkal : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात
मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात
Mumbai Protest Video Viral: मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
Embed widget