एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

उद्योगपतींचं कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचं का नाही? : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करतं मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हात आखडतं का घेतं? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसोबतच अनेक मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला. कर्जमाफी द्यायची नसेल तर दुसरा पर्याय सरकारनं द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. देशातील 9 उद्योगपतींकडे साडेआठ लाख कोटींचं कर्ज आहे. त्यांच कर्ज सरकार माफ करतं. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेण्यास सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 2006 साली महाराष्ट्रात दुष्काळ असताना तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनं दुष्काळी भागाचा दौरा केला. केंद्राकडे पाठपुरावा करत शेतकऱ्यांचं 72 हजार कोटींचं कर्ज माफ केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्यांचा सातबारा कोरा होणं आवश्यक आहे. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सरकारी यंत्रणा ढासळलेली आहे, ती शेतकऱ्यांना हात देऊ शकत नाही असा आरोपही त्यांनी केला. उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी, महाराष्ट्रात का नाही? उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आल्यानंतर लगेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. यूपीच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. राज्य सरकारला कर्ज घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं सहज शक्य आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. कर्जमाफीतून मुख्यमंत्र्यांना पळवाट नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना पळवाट काढता येणार नाही. त्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल. सरकारनं सत्तेत येताना दिलेली आश्वासनं पूर्ण करावी लागतील. अन्यथा सरकारकडे 2019 च्या निवडणुकीत जाहीरनाम्यासाठी मुद्दे नसतील. आयात निर्यात धोरण राबवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करायचं असेल तर विमा योजनाही सक्षम करणं आवश्यक असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्याला चांगला हमीभाव देणं गरजेचं आहे. ग्राहकाच्या हिताचा विचार करताना शेतकऱ्यांच्याही हिताचा विचार सरकारनं केला पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना वीज, पाणी देणं ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार ते जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलं आहे. सरकारच्या याच धोरणामुळे मराठवाड्यातील गुंतवणुक कमी झाली असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. गोंधळ घालणाऱ्या 90 आमदारांपैकी फक्त 19 जणांचंच निलंबन का? राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकूण 90 आमदारांनी गोंधळ घातला. मात्र सरकारनं फक्त 19 आमदारांचंच निलंबन केलं, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारवर निशाणा साधला. बँका सर्वांना कर्ज देतात, पण शेतकऱ्यांवर निर्बंध लावतात. ते निर्बंध न लादता शेतकऱ्यांना कर्जवाटप होणं गरजेचं आहे. कर्ज घेणं आणि फेडणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. त्यांना तो मिळाला पाहिजे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी द्यावी, मी स्वत: त्यांना हार घालेन : पृथ्वीराज चव्हाण सध्याचं सरकार पारदर्शक नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरलंय. पण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिली, तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. आम्हाला श्रेय नको, पण महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे असंही ते पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील पाणी, नागरी प्रशासनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, मात्र सरकारचं दुर्लक्ष होत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
मुंबई पालिकेत 87 हजारापेक्षा अधिक जन्म - मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता, अमित साटमांचे आयुक्तांना पत्र, सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा उल्लेख
मुंबई पालिकेत 87 हजारापेक्षा अधिक जन्म - मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता, अमित साटमांचे आयुक्तांना पत्र, सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा उल्लेख
Video: पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; बंगालच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची ममता दीदींवर टीका, 80 वर्षांचा इतिहास सांगितला
Video: पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; बंगालच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची ममता दीदींवर टीका, 80 वर्षांचा इतिहास सांगितला
West Bengal Results: ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget