एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
मुंबई मराठा मोर्चा: तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं!
मुंबईतील मराठा मोर्चाबाबत काय तयारी करण्यात आली आहे, पार्किंगची व्यवस्था काय, फ्रेश कुठं व्हायचं, लोकल कुठे पकडायची? याबाबत तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
मुंबई : ‘एक मराठा; लाख मराठा’ अशी घोषणा देत 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मूकमोर्चा निघणार आहे. त्याची जय्यत तयारी जशी मोर्चेकऱ्यांनी केली आहे, तशीच तयारी प्रशासनाकडूनही केली जात आहे.
मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे.
मोर्चासाठी संघटनांचं आवाहन
9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
शाळांना सुट्टी
मराठा मोर्चामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्यास, विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलं.
दक्षिण मुंबईतील सायन, माहिम, दादर, वरळी आणि भायखळा ते कुलाबा या परिसरातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
विविध जिल्ह्यातील मराठा बांधव एकवटणार
या मोर्चासाठी ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातला मराठा बांधव एकवटणार आहे. त्यामुळे मुंबई आणि लगतच्या उपनगरामधील रेल्वे स्टेशनवर ‘रेल मराठा स्वयंसेवक’ तैनात ठेवण्यात येतील. तसंच मराठा मोर्चात सामील होणाऱ्या वाहनांसाठी बीपीटी सिमेंट यार्ड आणि वडाळा ट्रक टर्मिनल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईत आल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी कसं पोहोचाल?
मोर्चासाठी बाहेरुन येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 5 हजार स्वयंसेवकाची फौज सज्ज असेल. पुणेमार्गे मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी पनवेल, कामोठे, खारघर, बेलापूर, जुईनगर, सानपाडा, वाशी तसेच ठाणे ऑक्ट्रॉय नाका, भाईंदर या ठिकाणी विशेष सोय करण्यात आली आहे.
पार्किंगची व्यवस्था
पुणे, सातारा , सांगली , कोल्हापूर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातून येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चेकरांना, नवी मुंबईतून मुंबईत जावे लागणार आहे.
नवी मुंबई लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावर आहे . मुंबई -पुणे महामार्गाला लागून सर्व रेल्वे स्टेशन आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या समोरील मैदानात वाहनांची पार्किंग करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्याला रेल्वे स्थानके वाटून देण्यात आली आहेत.
कोणत्या जिल्ह्याला कुठे पार्किंग?
- पुणे, सोलापूर - खारघर रेल्वे स्थानक, सेंट्रल पार्क मैदान
- अहमदनगर - खांदेश्वर रेल्वे स्थानक
- औरंगाबाद – मानसरोवर (कामोठे) रेल्वे स्थानक
- रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग - नेरुळ, सीवूड रेल्वे स्थानक, तांडेल मैदान
- बीड - सानपाडा रेल्वे स्थानक, दत्त मैदान .
- परभणी - वाशी रेल्वे स्थानक - महाराष्ट्र सदन .
- मुंबईत ठिकठिकाणी 8 आरोग्य कक्ष. प्रत्येक ठिकाणी 10 महिला डॉक्टर, 10 पुरुष डॉक्टर
- आझाद मैदानाचे प्रवेशद्वार 40 फुटांपर्यंत मोठे करण्यात आले आहे.
- आझाद मैदानात पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, फिरती शौचालये, 10 महिलांसाठी, 10 पुरुषांसाठी
- फायर इंजिन्सची व्यवस्था
- आझाद मैदानावर गर्दी झाल्यास, बॉम्बे जिमखान्याचे मैदानही खुले करणार
- ओसिएस वाहतूक चौक जंक्शन ते मेट्रो सिनेमा चौकापर्यंत भक्कम बॅरेकेटिंग
- हा मूक मोर्चा आहे.मोर्चात चालत असताना एकमेकांशी बोलणार नाही,घोषणा देणार नाही.
- मी मोर्चाचे गांभीर्य राखणार.कोणी घोषणा दिल्या तर त्याला तिथेच रोखणार.
- मोर्चात अधिकृत बॅनर शिवाय कोणतेही वैयक्तिक/संस्था संघटनांच्या नावाने बॅनर्स लावणार नाही.
- माझा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. मराठ्यांच्या मागण्यासाठी व आत्मसन्मानासाठी आहे.
- मोर्चात जास्तीत जास्त महिला सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार.
- मोर्चामध्ये मी कुठल्याही पक्षाचा किंवा संस्थेचा नसून फक्त मराठा म्हणून येणार.
- मोर्च्यांच्या दिवशी सकाळी ११:०० वा. कुटुंबासह दाखल होणार.
- मोर्चात स्वयंशिस्त पाळून मराठा समाजाच्या सुसंस्कृतपणा दाखवणार, पोलिसांना सहकार्य करणार.
- मोर्चात मी कोणतेही व्यसन करून सहभागी होणार नाही,कोणाला करूही देणार नाही.
- महिला,लहान मुले व वृद्धांना सहकार्य करणार,माता,भगिनींना पुढे जाऊ देईन.
- मला जिथे जागा मिळेल तिथूनच मी चालेल. मी घाई गडबड करणार नाही.
- मोर्चाला अत्यंत शांततेत येणार व गावाकडे परत शांततेत जाणार.
- कुणालाही त्रास होणार नाही असे माझे वर्तन राहील.
- मोर्चात झालेला कचरा उचलून कचरा कुंडीत टाकणार,रिकाम्या पाण्याच्या बॉटल,पाऊच आणि पडलेले ग्लास गोळा करण्यासाठी प्रयत्न करणार.
- स्वाभिमान,स्वावलंबन,शिक्षण, सहकार्य,जागृती या पंचसूत्रीचा समाजविकासासाठी अंगीकार करणार.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
भारत
निवडणूक
Advertisement