एक्स्प्लोर

केंद्र सरकारचा दीडपट हमीभाव ही निव्वळ धूळफेक, हायकोर्टात याचिका

विविध पिकांना केंद्र सरकारने जुलै महिन्यात हमीभावाची घोषणा केली होती. मात्र यातून सरकारने निव्वळ धूळफेक केली आहे, असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला जाहीर केलेला दीडपट हमीभाव ही निव्वळ धूळफेक असून हा आदेशच बेकायदेशीर आहे, असा आरोप करत सातारा कोरेगाव येथील एक शेतकरी राजेश शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे यावर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर हायकोर्टाने यावर केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. शेतीमालाला योग्य तो भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. अस्थिर कृषी धोरणामुळे अल्पभूधारक शेतकरी हे आज शेतमजूर बनलेत. याला उपाय म्हणून मोदी सरकारने शेतमालाला दीडपट हमीभाव मिळवून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या कमिटीने जुलै 2018 मध्ये यावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर वचनपूर्ती केल्याचा दावा करत मोदी सरकारने हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं जाहीर केलं. मात्र हा निर्णयच बेकायदेशीर असल्याचा आरोप या याचिकेतून करण्याक आलाय. केंद्र सरकारने हा हमीभाव निश्चित करताना कृषी आयोगाने घालून दिलेले निर्देश पाळले नसल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलाय. तसेच सध्याच्या कृषी आयोगावर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आलं नसल्याकडेही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाचं लक्ष वेधून दिलंय. त्यामुळे चुकीची आकडेमोड करून हा फुगीर हमीभाव जाहीर केल्याचा आरोपही या याचिकेतून करण्यात आलाय. शेतीमालाचा हमीभाव काढताना ए-2 म्हणजे बी-बियाणे, खतं, अवजारं यांच्यावरील खर्च एफएल म्हणजे कौटुंबीक खर्च आणि सी-2 म्हणजे जमिनीचे भुईभाडे, मार्केटिंगचा खर्च आणि शेतीमालाच्या वाहतुकीचा खर्च यावर उत्पादनाचा खर्च काढला जातो. मात्र समितीने यंदाचा हमीभाव काढताना जमिनीचे भुईभाडे, मार्केटिंगचा खर्च आणि शेतमालाच्या वाहतुकीचा खर्च वगळून हा हमीभाव काढलेला आहे. त्यामुळे आधी मिळणाऱ्या हमीभावाच्या तुलनेने या हमीभावानुसार दर क्विंटलमागे 350/- ते 400/- रूपयांची तफावत आहे, असं या याचिकेत नमूद करण्यात आलंय. त्यामुळे हमीभाव ठरवणाऱ्या समितीत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनाही स्थान देऊन नव्याने हमीभाव ठरवण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग तयार होत राहिले; कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय?, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी A टू Z सांगितलं!
समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग तयार होत राहिले; कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय?, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी A टू Z सांगितलं!
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget