![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar : 'जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद', शरद पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादीचे आमदार खासदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
![Sharad Pawar : 'जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद', शरद पवार स्पष्टच म्हणाले... NCP leader sharad pawar slams central government on g 20 and India point detail marathi news Sharad Pawar : 'जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद', शरद पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/0ead2644dbfb2c513a4bc7ae0c8d59241694349634937720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 'जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दरवाजे बंद झालेत', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सत्तेत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांबाबत बोलतांना शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय. तर यावेळी शरद पवारांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार यांनी संबोधित केलं. महाविकास आघाडीमध्ये ज्या काही आपल्या वाटेला 70-80 येतील त्याच्या तयारीला लागण्याचं आवाहन देखील शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
देशाचं नाव भारत करण्याचा अट्टाहास का? - शरद पवार
जी-20 च्या आमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ भारत असं नाव टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात दावे- प्रतिदाव्यांना सुरुवात झाली. यावर शरद पवार यांनी देखील भाष्य केलं आहे.देशाचं नाव बदलण्याचा इतका अट्टाहास का हा सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मग आता गेटवे ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँकेचे देखील नाव बदला.'
जी -20 परिषदेवर शरद पवारांचा घणाघात
'जी -20 सारख्या परिषदा यापूर्वी दोनदा आपल्या देशात झाल्या. एकदा इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना झाली होती. पण त्यावेळी आज ज्या पद्धतीचं वातावरण होतं, तसं नव्हतं. त्यावेळी देखील जगातले लोक भारतात आले होते. जगातले राष्ट्रपती आपल्या देशात येतात त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. पण यामुळे मूलभूत प्रश्न सोडून काही ठराविक लोकांचा मोठेपणा दाखवण्यात आला आणि याची चर्चा आज ना उद्या देशांत नक्की होईल', असं शरद पवार म्हणाले.
'महत्त्वाचे प्रश्न बाजूला सारले'
शरद पवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधला, यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली, की आता देशाच्या पातळीवर अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यांना बाजूला सारुन आपल्याला हवं तसं वातावरण निर्माण करण्यात आलं. यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या दिशेने त्यांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे.'
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, 'महागाईचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न या कोणत्याच प्रश्नाकडे आताचे राज्यकर्ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. हा प्रयत्न आपण करतच राहू.' तर देशातील जनतेचं लक्ष विचलित करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)