एक्स्प्लोर

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीची शक्यता, सातही धरणांमध्ये 37 टक्केच पाणीसाठा

Mumbai Water Cut News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सद्यस्थितीमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.

Mumbai Water Cut News: ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईवर (Mumbai Water Cut) पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मुंबईला (Mumbai News) पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या केवळ 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाचे आगमन लांबल्यास मुंबईत पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही. जून, जुलैच्या पावसावर (Rain Updates) पाणी कपाती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेच्या (BMC News) वतीनं करण्यात आलं आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सद्यस्थितीमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. सातही धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर त्यापैकी सद्यस्थितीत 5 लाख 45 हजार 198 दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा या सातही तलावांमध्ये आहे. जून आणि जुलैमध्ये पाऊस किती पडतो? यावर पाणीपुरवठ्याचे नियोजन ठरणार आहे. 

 सद्यस्थितीत 31 जुलैपर्यंत मुंबईला पाणी पुरेल तशा प्रकारचे नियोजन जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आलं आहे. मागील वर्षी मुंबईत पाऊस चांगला झाला आणि मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरली होती. ऑक्टोबररच्या अखेरीस धरणांमध्ये 97 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली, असं वाटत होतं. मात्र अद्याप एप्रिल महिना सुरूही झालेला नसताना धरणांतील पाणीसाठा 37 टक्क्यांवर आला आहे.

मागील वर्षी याच महिन्यामध्ये साती धरणातील पाणीसाठा जवळपास 40 टक्क्यांपर्यंत होता. त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने आणि त्यानंतर पुढील जून जुलै असे दोन महिने असे एकूण चार महिने या धरणातील पाणीसाठ्यावर मुंबईकरांना काढावे लागणार आहेत. 

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होत असतो. दर दिवशी 3800 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात या सातही तलावातून केला जातो. यावर्षी अजून तरी पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून आणि जुलैमध्ये किती पाऊस पडतो, त्यावर मुंबईच्या पाणी कपाती संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. 

जल बोगद्याच्या कामामुळे मुंबई, ठाण्यात 30 एप्रिलपर्यंत पंधरा टक्के पाणी कपात

जल बोगद्याच्या कामामुळे मुंबई आणि ठाण्यात आजपासून पासून 30 एप्रिलपर्यंत पंधरा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. आजपासून ते 30 एप्रिलपर्यंत जल बोगद्याच्या दुरुस्तीचे काम ठाणे येथे सुरू असल्यानं पंधरा टक्के पाणी कपातीचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जल बोगद्याच्या ठाणे येथील कुपनलिकेच्या खोदकामामुळे आणि वाचून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. 

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी (Farmers) अति भीती बाळगण्याचं कारण नाही. मात्र, सावधानता बाळगावी असं आवाहन खुळे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai Water Cut:  मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 31 मार्चपासून 30 दिवस 15 टक्के पाणीकपात, जाणून घ्या याचं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Embed widget