एक्स्प्लोर

मुंबईकरांनो, आवश्यक असेल तरच घरापासून दोन किलोमीटरच्या आतच फिरा; अन्यथा कारवाई होणार

मुंबई पोलिसांनी शहरात लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यास सुरुवात केली आहे. आता घरातून विनाकारण बाहेर पडल्यास कारवाई होणार आहे.

मुंबई : तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर राज्यात अनलॉक वन राज्‍य सरकारकडून सुरू करण्यात आलेला आहे. मात्र, कोरोनाचं संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाही. तरीही रस्त्यांवर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. ज्याला रोखण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनी अनलॉक पॉलिसी संदर्भात राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्यास नागरीकांना आवाहन केलं असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहेत. सरकारने उद्योगधंदे सुरू करण्यास मुभा दिली असून नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत काहीजण विनाकारण घराबाहेत पडत आहेत. परिणामी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडता दिसत आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. लोकांनी या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पोलिसांनी केलंय. पोलिसांकडून देण्यात आलेले नियम
  • केवळ अत्यावश्य काम असेल तरचं घराबाहेर पडावे
  • घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.
  • घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठा, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. दोन किमीच्या बाहेर जाऊ नये.
  • व्यायामाची परवानगी घरापासून 2 किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.
  • कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत दोन किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.
  • सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  • वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
  • सोशल डिस्टन्सिंगचे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.
  • रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यानच्या कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनीवर बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.
  • वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.
  • मुंबईच्या रस्त्यांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात विनाकारण बाहेर पडणाऱ्यावंर कारवाई करण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांची वाहने पोलिसांनी जप्त केली जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत लॉकडाऊनचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्याचे जनतेला आवाहन तसेच राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत आणि जर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर लॉकडाऊनची घोषणा करण्यात येऊ शकते, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लोकांनी दिलेल्या नियमांचे पालन करुन आपली कामं करावी आणि या आजारापासून स्वतःला आणि इतरांना वाचवता येईल, याची दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. त्यामुळे लोकांनी गाफील राहून चालणार नाही आणि लोकांनी घरातून आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते आणि त्या वेळेला फक्त जीवनावश्यक वस्तू सुरू राहिल, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. CM Uddhav Thackeray | 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

Wedding Card Couple Age Mandatory: लग्नपत्रिकेवर वर-वधूच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार; राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकार लवकरच नियम लागू करणार, नेमकं कारण काय?
लग्नपत्रिकेवर वर-वधूच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार; राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकार लवकरच नियम लागू करणार, नेमकं कारण काय?
Omraje Nimbalkar Operation Tiger: ओमराजेंसाठी एकनाथ शिंदेंचे खटाखट निर्णय काल धाराशिवमधील कार्यकारिणी बरखास्त आज लगेच 18 कोटींचा निधी मंजूर
ओमराजेंसाठी एकनाथ शिंदेंचे खटाखट निर्णय काल धाराशिवमधील कार्यकारिणी बरखास्त आज लगेच 18 कोटींचा निधी मंजूर
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेला ओम बिर्लांनी भेटीसाठी बोलावलं; म्हणाले, 'तुमची बाजू मांडण्यासाठी आजच लोकसभा अध्यक्षांच्या समोर या'
ठाकरेंच्या शिवसेनेला ओम बिर्लांनी भेटीसाठी बोलावलं; म्हणाले, 'तुमची बाजू मांडण्यासाठी आजच लोकसभा अध्यक्षांच्या समोर या'

व्हिडीओ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिने लग्नास नकार देताच थेट हनिमूनचे डीपफेक फोटो तयार केले, एकाच दिवसात तब्बल 500 ओला, उबर आणि रॅपिडो टॅक्सी तिच्या घरी पाठवल्या अन्
तिने लग्नास नकार देताच थेट हनिमूनचे डीपफेक फोटो तयार केले, एकाच दिवसात तब्बल 500 ओला, उबर आणि रॅपिडो टॅक्सी तिच्या घरी पाठवल्या अन्
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
पीएम मोदी काल राष्ट्रपतीच्या भेटीला अन् आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा, आप, टीएमसीसह राज्यातील फुटीर खासदारांना मंत्रिपदांची शक्यता
पीएम मोदी काल राष्ट्रपतीच्या भेटीला अन् आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा, आप, टीएमसीसह राज्यातील फुटीर खासदारांना मंत्रिपदांची शक्यता
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
Pune Crime Siya Goyla: लग्नापूर्वीच सिया गोयलला सासूची वॉर्निंग, 'तुला एकाही पार्टीला पाठवणार नाही, आमच्या घरात ड्रिकिंग अलाऊड नाही'
लग्नापूर्वीच सिया गोयलला सासूची वॉर्निंग, तुला एकाही पार्टीला पाठवणार नाही, आमच्या घरात ड्रिकिंग अलाऊड नाही
'आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं' छोटे छोटे जॅक, टॉमी, बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो; अर्चना पाटलांचे ओमराजेंना चिमट्यांवर चिमटे
'आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं' छोटे छोटे जॅक, टॉमी, बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो; अर्चना पाटलांचे ओमराजेंना चिमट्यांवर चिमटे
कोल्हापुरात तरण्याबांड लेकरांनी आयुष्य संपवण्याची मालिका संपता संपेना; आता माजी महापौरांच्या नातवाचा टोकाचा निर्णयानं सन्नाटा
कोल्हापुरात तरण्याबांड लेकरांनी आयुष्य संपवण्याची मालिका संपता संपेना; आता माजी महापौरांच्या नातवाचा टोकाचा निर्णयानं सन्नाटा
Embed widget