एक्स्प्लोर

ईडीच्या चौकशीच्या रडारवर आता मुंबईतील बिल्डर, ओमकार ग्रुपचे बाबुलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांना अटक

मुंबईतील बिल्डर आता ईडीच्या रडारवर आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बड्या बिल्डर्सवर ईडीने कारवाया केल्या आहेत.काही बिल्डर्सचे बड्या राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. ज्यामुळे ईडीच्या तपासाचा ससेमिरा आता बिल्डरकडे वळला आहे.

मुंबई : ओमकार ग्रुपचे बाबुलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांना ईडी ने 22 हजार कोटींची आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. मुंबईतील मोठ्या विकासक समुहांमध्ये ओमकार समुहाचा समावेश आहे. फक्त ओमकारचं नाही तर चार दिवसांपूर्वी विवी ग्रुपवर ईडीने रेड टाकत मेहुल ठाकूरला सुद्धा अटक केली होती.

एक महिन्यापूर्वी जे पी इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा रेड टाकून ईडीने काही कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केलं होतं. तर काही दिवसांपूर्वी विकासक अविनाश भोसलेची चौकशी सुद्धा ईडीकडून करण्यात आली होती. अविनाश भोसले पुण्याचे व्यसायिक असून त्यांचे बड्या राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. ज्यामुळे ईडीच्या तपासाचा ससेमिरा आता बिल्डरकडे वळला आहे.

ईडीकडून का राबवल जातंय  ऑपरेशन बिल्डर?

मुंबईतील बिल्डर आता ईडीच्या रडारवर आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बड्या बिल्डर्सवर ईडीने कारवाया केल्या आहेत. कालच ईडीने ओमकार समूहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकी संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली. तर 4 दिवसांपूर्वी विवा ग्रुपचे मेहुल ठाकूरला अटक केली. मात्र बिल्डरांच्या माध्यमातून ईडी राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. याचे कारण ही तसच आहे.

आपला पैसा गुंतवण्यासाठी बांधकाम क्षेत्र हे सर्वात उपयुक्त क्षेत्र मानलं जातं. त्यात नफा ही दहा पटीने वाढतो आणि आपलं नावंही येत नाही. तर नुकसान होण्याची शक्यता ही खूप कमी असते. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पैश्यांची उलाढाल होते.

ओमकार बिल्डर का आले ईडीच्या रडारवर?

410 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सुराणा ग्रुपने औरंगाबाद येथील ओमकार समुहावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तीन दिवसापूर्वी ईडीने ओमकार समूहाच्या दहा जागांवर धाड टाकत चौकशी केली. या प्रकरणात कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना अटक केली. इतकंच नाही तर 22 हजार कोटींच प्रकरणी सुद्धा ओमकार ग्रुपच्या अडचणी वाढू शकतात. कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल असून कोर्टाने याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत आणि याचाही तपास ईडीने सुरू केला आहे.

काय आहे हे 22 हजार कोटींच प्रकरण?

जोगेश्वरी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावावर ओमकार समूह आणि गोल्डन एज समूह यांनी मिळून सुमारे 22 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्ज घेण्याचे व्यवहार होऊन नऊ-दहा वर्षे उलटली तरी घरे बांधलेली नाही. हा आरोप करत एक याचिका मुंबईच्या उच्च न्यायालयात दाखल झाली. या प्रकरणात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन आणि सक्तवसुली संचालनालयाला त्यांची बाजू मांडण्याचा आदेश दिला.

फक्त ओमकार समुहच नाही तर विवा ग्रुप आणि जे पी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. जे पी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये उत्तर प्रदेशच्या एका बड्या नेत्याच्या जवळचा पैसा गुंतवला आहे. ज्यामुळे जे पी इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून त्या नेत्या पर्यंत पोहचण्याच्या तयारीत ईडी आहे का असा ही सवाल उपस्थित होत आहे.

आर्थिक गणितांमुळे आधीच बिल्डरांची कोंडी झाली आहे. त्यामध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून करोनामुळे सर्व व्यवहार बंद होते. घरं तयार आहेत मात्र पैशाअभावी त्याला खरेदी करणारे मिळत नाही आहे.अशातच ईडीच्या या कारवायांन मुळे येणाऱ्या दिवसात काय चित्र असेल ते पाहण महत्त्वाच असणार आहे.

संबंधित बातम्या :

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बायकोच्या व्हाट्सअपवर स्टेटसवर एकाने केली अश्लील कमेंट, जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या
धक्कादायक! बायकोच्या व्हाट्सअपवर स्टेटसवर एकाने केली अश्लील कमेंट, जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या
तुम्ही कसले मुख्यमंत्री? मराठी भाषा भवन उभं राहिलं नाही पण भाजपचं कार्यालय उभ राहतंय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
तुम्ही कसले मुख्यमंत्री? मराठी भाषा भवन उभं राहिलं नाही पण भाजपचं कार्यालय उभ राहतंय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीनचीट
मोठी बातमी! शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीनचीट
Video: विमान अपघातावर तुम्हाला शंका वाटते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले
Video: विमान अपघातावर तुम्हाला शंका वाटते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले

व्हिडीओ

Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
मोठी बातमी! शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीनचीट
मोठी बातमी! शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीनचीट
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
Video: विमान अपघातावर तुम्हाला शंका वाटते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले
Video: विमान अपघातावर तुम्हाला शंका वाटते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणबाबत पटेल, तटकरेंना माहिती होती,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, अजितदादांसोबतच्या बैठकीचा दाखला दिला  
अजितदादा म्हणालेले एक आमदार सोडून सर्वजण मी सांगेल तिथं सही करतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
Embed widget