एक्स्प्लोर

हिंदुत्वाच्या मुद्यानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजप एकत्र, कल्याणमध्ये काढला तहान मोर्चा   

Kalyan News : मनसे (MNS ) आमदार राजू पाटील आणि (BJP) भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Kalyan News : कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांमध्ये नागरिकांना  मोठ्या प्रमाणात  पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पाणी समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी आणि निवेदने देऊनही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे आज मनसे (MNS ) आमदार राजू पाटील आणि भाजप (BJP) आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
 
कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय  मॉलापासून काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेही सहभागी झाले होते.   शिवाय या मोर्चात मनसे आणि भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चातील महिलांनी डोक्यावर हंडा कळशी घेतली होती. शिवाय केडीएमसी आणि आयुक्तांच्या निषेधाचे फलक होते. 

दरम्यान, आमदार पाटील आणि चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आयुक्तांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, आयुक्त हजर नसल्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासमोर संताप व्यक्त केला. आयुक्तांना मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती असताना ते हजर का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत आयुक्त केवळ ठाण्यातील नेत्यांना भेटतात का? असा आरोप मनसे आमदार पाटील यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेणार नसाल तर महापालिकेला कुलूप लावण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला. 

नवीन गृहसंकुलाचा पाणी पुरवठा बंद करा आणि ते पाणी गोरगरीब जनतेला द्या. महापालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याच्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसवा आणि पाणी वितरणाची व्यवस्था तातडीने सुधारण्यात यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबरोबरच 27 गावांमध्ये 200 हून जास्त टँकर पुरवले जातात, त्यामुळे हा भाग दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू असताना आजच्या तहान मोर्चात हे दोन्ही पक्ष एकत्रित आल्यामुळे ही युतीची नांदी आहे का? अशी चर्चा होत आहे. यावर बोलताना आमदार रवींद्र चव्हान म्हणाले, "आमच्या नेत्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्यास सांगितले आहे. त्यामुळे लोकहितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत."

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Embed widget