एक्स्प्लोर

देशातल्या पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाचं पंचवीसावं ब्रेक थ्रू पूर्ण; मुंबईच्या पोटात नेमकं चाललंय काय?

देशातील पहिल्या भुयारी मेट्रोचं काम मुंबईत सुरू आहे. या प्रकल्पाचं पंचवीसावे ब्रेक थ्रू आज पार पडले. या पार्श्वभूमीवर मेट्रो कामाबद्दल घेतलेला आढावा.

मुंबई : देशातल्या पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाचे पंचवीसावे ब्रेक थ्रू पार पडले. वरळी सायन्स सेंटरपासून दूरदर्शन या अतिशय वर्दळीच्या आणि दाटीवाटीव्या परिसरात 2.07 किलोमीटरच्या टप्प्याचा पहिला ब्रेकथ्रू पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. गेल्या काही वर्षात वरळी कमर्शियल हब बनले आहे. त्यामुळे इथे दररोज येणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातोय. या पॅकेज अंतर्गत महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, अकॅहरी अत्रे चौक व वरळी या स्थानकांचा समावेश आहे. मुंबईच्या पोटात सुरू असलेलं हे काम नेमकं चालतं कसं? ब्रेक थ्रू म्हणजे काय? या सर्वांचा या बातमीत आढावा घेतला आहे. मुंबईच्या उदरात जवळपास 60 ते 70 मीटर खोल हे भुयारीकरणाचं काम सुरू आहे. भुयार खोदणाऱ्या या एका टीबीएमचं वजन साधारण 400 टन आहे. असे 17 अवाढव्य मशीन्स मुंबई मेट्रोसाठी भुयार तयार करतायत. टीबीएम जेव्हा ठरवलेल्या भुयारी मार्गावर खोदकाम पूर्ण करते त्याला ब्रेकथ्रू म्हणतात या टिबीएमची नावं सुद्धा इंटरेस्टिंग आहेत, वैणगंगा, कृष्णा, सूर्या. गेली तीन वर्ष हे काम सुरू आहे. या टीबीएमला 24 सप्टेंबर 2018 रोजी पहिला ब्रेक थ्रू मिळाला होता. याची माहिती तत्कालिन प्रमुख अश्विनी भिडे वेळोवेळी ट्विटरवरुन शेअर करत होत्या. आज वरळीत आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पंचविसावा ब्रेकथ्रू पूर्ण झाला. आता दररोज 70-75 लाख मुंबईकरांना लोकल ट्रेनने अमानवी पद्धतीने प्रवास करावा लागतो. 1700 क्षमता असलेल्या एका लोकलमध्ये 4500 प्रवाशी प्रवास करतात, साधारण एका स्क्वेअर मीटर जागेत 12 ते 15 प्रवासी कोंबून घेतात. पुढच्या अकरा वर्षात या महानगराची लोकसंख्या साडेतीन कोटीवर जाईल असा अंदाज आहे. त्यामुळेच 12 मेट्रो लाईन्सचं जाळं लोकलवरील हा ताण कमी करेल आणि मुंबईकरांचं जीवन काहीसं सुखकर करेल अशी आशा बाळगली जात आहे. त्याचाच एक भाग मुंबई मेट्रो - 3 ही कुलाबा ते सीप्झ ही मेट्रो. देशातल्या पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाचं पंचवीसावं ब्रेक थ्रू पूर्ण; मुंबईच्या पोटात नेमकं चाललंय काय? पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेणार - आदित्य ठाकरे आरे कार शेडबाबत समितीचा अहवाल प्राप्त झाला असला तरी तो बाईंडिंग नाही. मुख्यममत्र्यांकडे अहवाल दाखल झाला आहे. त्यावर अभ्यास आणि विचार करून योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया उद्घाटनानंतर पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांचं काम विरोध आणि मागणी करणं आहे, ते त्यांना करत राहू दे. पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईन. नाईट लाईफ बंधनकारक नाही. ज्या व्यापाऱ्यांना दुकानं उघडी ठेवायची असतील त्यांनी ठेवावीत, ज्यांना नाही ठेवायची त्यांच्यावर कसलंही बंधन नाही. नाईट लाईफ कायदे आणि नियमानुसारच लागू होणार, असल्याचंही त्यांनी सांगितलं. Mumbai Metro 3 | मेट्रोच्या तिसऱ्या प्रकल्पातील भुयारीकरणाचा 25 वा टप्पा पूर्ण | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget