एक्स्प्लोर

केवळ घोषणा नको, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस

शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही.

मुंबई : परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, गेल्या 3-4 दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तो मदतीसाठी आर्जव करत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकर्‍यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, मराठवाड्यातील अतिवृष्टी यापैकी एकाही प्रसंगात राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी उभी राहिले नाही. आता पुन्हा परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, धान इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पिकांना कोंब फुटली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अनेक तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, परळी तालुक्याला मोठा फटका बसला आहे. पीक काढणीचे काम सुरू असतानाच हा तुफान पाऊस झाल्याने आता शेतकर्‍यांच्या हाती पीक लागणार नाही. सोयाबीनच्या लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी स्थिती आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्‍यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर तो टाहो फोडून ओरडत आहे. मदतीसाठी आर्जव करीत आहे आणि जुनीच मदत मिळाली नसल्याने आता जगायचे तरी कसे, असा त्याचा प्रश्न आहे. जवळपास अशीच स्थिती विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. भंडारा-गडचिरोली-गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भातपीकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर जवळपास 10-12 दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. धान, सोयाबीन अशा दोन्ही पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला कोंब आणि कपाशीला बुरशी म्हणजे कोणतेच पीक हाती नाही. ज्वारी सुद्धा मातीमोल झाली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

कोकणातील जिल्हे आणि पालघरमध्ये भातपीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे धान कापले तरी संकट आणि नाही कापले तरी संकट, अशी इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. सातत्याने होणारे नुकसान, त्यात कोणत्याही प्रसंगात मदत न मिळणे, यामुळे अतिशय गंभीर प्रश्न शेतकर्‍यांपुढे उपस्थित झाले आहेत. अनेक जिल्ह्यात पूर्वीच्याच पंचनाम्यांनंतर नुकसानभरपाई अजून मिळाली नाही. सातत्याने विनंती करूनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही. बांधावर 25 आणि 50 हजार हेक्टरी मदतीची मिळालेली आश्वासनं स्मरून तर शेतकर्‍यांना आणखी वेदना होत आहेत. मराठवाड्यातील प्रश्न फारच गंभीर आहेत. तेथे तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्‍याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on NCP Merger: रेवतीच्या लग्नाची बातमी द्यायला अजितदादांना फोन केला, पण शरद पवारांना बोलता येत नव्हतं, साहेबांची अवस्था पाहून अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं: रोहित पवार
पवार साहेबांना बोलायचं होतं पण छातीत कफ असल्यामुळे शब्द कळत नव्हते, 'ती' अवस्था पाहून अजित पवारांचे डोळे पाणावले: रोहित पवार
Ritu Tawde Rolex Watch: रितू तावडेंच्या मनगटावर तब्बल 1 कोटीचं घड्याळ? सोशल मिडीयावर ट्रोल होताच मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण म्हणाल्या, 'ते घड्याळ...'
रितू तावडेंच्या मनगटावर तब्बल 1 कोटीचं घड्याळ? सोशल मिडीयावर ट्रोल होताच मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण म्हणाल्या, 'ते घड्याळ...'
मोठी बातमी! जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य; कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, संख्या किती?
मोठी बातमी! जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य; कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, संख्या किती?
...तर माझं नाव कुणालाच कळलं नसतं, धनंजय मुंडेंनी सांगितली अजितदादांची 'ती' आठवण 
...तर माझं नाव कुणालाच कळलं नसतं, धनंजय मुंडेंनी सांगितली अजितदादांची 'ती' आठवण 

व्हिडीओ

Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण
Rohit Pawar on Ajit Pawar Accident : दादांच्या अपघाताच्या चौकशीचा तिढा FIR साठी लढा` Special Report
Sunetra Pawar NCP President : आव्हानांचे डोंगर सुनेत्राताई कशा पेलणार? Special Report
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Sunetra Pawar UNCUT Speech : हुंदका दाटला, निर्धार केला, दादांची स्वप्न पूर्ण करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारावी परीक्षेत 'फाटाफुटी' सुरुच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर सुद्धा फोडला; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
बारावी परीक्षेत 'फाटाफुटी' सुरुच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर सुद्धा फोडला; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही; कृत्रिम बुद्धिमत्तेत डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील; राज ठाकरेंचा मराठी मनाला 'मनसे' कानमंत्र
तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही; कृत्रिम बुद्धिमत्तेत डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील; राज ठाकरेंचा मराठी मनाला 'मनसे' कानमंत्र
India vs West Indies : पॉइंट्स, रनरेट अन् संपूर्ण समीकरण फसलं! IND vs WI सामना रद्द झाला तर सेमीफायनलचं तिकीट कोणाच्या खिशात जाणार?, जाणून घ्या ICC नियम
पॉइंट्स, रनरेट अन् संपूर्ण समीकरण फसलं! IND vs WI सामना रद्द झाला तर सेमीफायनलचं तिकीट कोणाच्या खिशात जाणार?, जाणून घ्या ICC नियम
HSC paper leak: बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?
बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?
Rajya Sabha Election 2026: मोठी बातमी: उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत मोठा डाव टाकणार? अंबादास दानवे, विनायक राऊतांना दिल्लीला पाठवणार?
उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत मोठा डाव टाकणार? अंबादास दानवे, विनायक राऊतांना दिल्लीला पाठवणार?
Rinku Singh Father Dies : सिलिंडर उचलून मुलाला स्टार बनवणाऱ्या बापाने अखेरचा श्वास घेतला, रिंकूचं पितृछत्र हरपलं, रिंकू सिंहच्या वडिलांना कोणता आजार झाला होता?
सिलिंडर उचलून मुलाला स्टार बनवणाऱ्या बापाने अखेरचा श्वास घेतला, रिंकूचं पितृछत्र हरपलं, रिंकू सिंहच्या वडिलांना कोणता आजार झाला होता?
Ideas of India : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडियाला सुरुवात
Ideas of India : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडियाला सुरुवात
Dhananjay Munde on Rohit Pawar: सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या दिवशीच बारामतीत एफआयआरसाठी स्टंट; धनंजय मुंडेंनी डागली रोहित पवारांवर तोफ
सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या दिवशीच बारामतीत एफआयआरसाठी स्टंट; धनंजय मुंडेंनी डागली रोहित पवारांवर तोफ
Embed widget