एक्स्प्लोर

राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावं : आशिष शेलार

राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो, असाही टोला लगावला.

मुंबई : ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केलं, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली आहेत, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. तसेच, ‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे, असेही ते म्हणाले. विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका शेलारांनी राज ठाकरेंवर केली. तसेच, याआधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो, असाही टोला लगावला. अतुल भातखळकरांचीही राज ठाकरेंवर टीका “मोदीमुक्त भारत करण्याआधी महाराष्ट्रानेच त्यांना मनसेमुक्त केलेला आहे. पराभूत मानसिकतेतून केलेली ही केविलवाणी धडपड आहे. ‘मोदीमुक्त भारत’ करण्यासाठी यांच्याकडे नेते कोण आहेत? यांचे नेते गल्लीपुरते मर्यादित आहेत.”, अशी टीका आमदार अतुल भातखळकरांनी राज ठाकरेंवर केली. ज्यांनी नगरसेवक पळवले, त्यांच्यावर टीका नाही. पण भारत मोदीमुक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतो आहे, असेही भातखळकर म्हणाले. राज ठाकरे काय म्हणाले? ''भारताला 1947 साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य 1977 साली मिळालं आणि आता 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,'' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. मोदींचा सामना करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मुंबईत शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त राज ठाकरे बोलत होते. त्यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी देशाला फसवलं आहे. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे लोकांनी बेसावध राहू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaugcha Raja News : एकुलता एक मुलगा... लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला, पण घरी परतलाच नाही, 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
एकुलता एक मुलगा... लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला, पण घरी परतलाच नाही, 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
Disha Salian Case: मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
Devendra Fadnavis on Drought: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना म्हणाले...
दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना म्हणाले...

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Pune Crime News: शटर तोडले, लाॅकर फोडले! भांडारकर रोडवरील साडीच्या शोरूममध्ये चोरी; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
शटर तोडले, लाॅकर फोडले! भांडारकर रोडवरील साडीच्या शोरूममध्ये चोरी; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
Raj Thackeray: राज ठाकरेंकडून UPI शुल्कावरुन सरकारच्या बदलेल्या भूमिकेची चिरफाड, डिजिटल सापळ्याचा उल्लेख करत म्हणाले...
राज ठाकरेंकडून UPI शुल्कावरुन सरकारच्या बदलेल्या भूमिकेची चिरफाड, डिजिटल सापळ्याचा उल्लेख करत म्हणाले...
Embed widget