एक्स्प्लोर

Shiv sena - BJP : ठाकरे गटाकडून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होतोय का? 

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औपचारिक गप्पांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आली अलल्याचे म्हटले. एवढ्यावरच न थांबता ही कटुता संपवली पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मुंबई : ठाकरे गट (shiv sena uddhav balasaheb thackeray) भाजपशी (BJP) जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. त्याचं कारण म्हणजे आज सामनामधील (saamana) आग्रलेखातून ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कटुता संपवण्यासाठी आवाहन करण्यात आलं. सामनाच्या या अग्रलेखामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील गट भाजपसोबत युती करू इच्छित आहे का? दोन्ही पक्ष आपापसातील वैर संपवू इच्छित आहेत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेची अचानक नरमलेली भूमिका भाजपसाठी धक्कादायक आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औपचारिक गप्पांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आली अलल्याचे म्हटले. एवढ्यावरच न थांबता ही कटुता संपवली पाहिजे अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आज दैनिक सामनामध्ये कटुता संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी उचलावाच असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर राजयकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू झाल्या की, दोन्ही पक्ष आपापसातील वैर संपवू इच्छित आहेत का? 

सामनाच्या अग्रलेखाचा मसुदा कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तयार केला होता. राऊत काही महिन्यांपूर्वी तुरुंगात गेल्यानंतर संपादकीय कोण लिहिते हे आता गूढ आहे. असे असले तरी सामनाच्या संपादकीयमध्ये छापलेली कोणतीही गोष्ट उद्धव यांच्या मते मानली जाते. कारण उद्धव ठाकेर सामनाचे मुख्य संपादक आहेत. 

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न काल देवेंद्र फडवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, “इतकी कटुता आहे, मला असे काही लवकर होईल असे दिसत नाही. जे काही घडले त्यामुळे मन दुखावले गेले.” देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या वक्तव्याला आज सामनातून उत्तर देत ही कटुता संपण्याचं आवाहन करण्यात आलं.  “महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ कटुताच नाही तर सूडाचे विषही वाहत आहे. महाराष्ट्रातील एकात्मतेची परंपरा कायम राहिली पाहिजे, या फडणवीस यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!!” असे आवाहन सामतातून करण्यात आले आहे. 

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपमधील कटुता समोर आली होती. देवेंद्र फडवीस त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी पत्रकारांना त्यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केले होते. विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले होते आणि नवे सरकार स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याच्या मार्गवर होती. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षांनी घेण्याचे शिवसेनेला आश्वासन दिले होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. मात्र, पत्रकारांसोबत औपचारिक गप्पा मारताना फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावत उद्धव ठाकरे खोटे बोलत असल्याचे म्हटले होते. ही बातमी लगेचच अनेक माध्यमांमध्ये प्रसारीत झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या उद्धव यांनी भाजपसोबतची युती तोडली आणि राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची कधीच समोरा-समोर भेट झाली नाही. शिवाय दोघांनीही अनेक वेळा एका मंचावर येणे टाळले.  

जून महिन्यात शिवसेनेतील बंडखोरीचा उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. उद्धव ठाकरे यांना फक्त मुख्यमंत्रीपदावरूनच बाजूला करण्यात आले नाही तर  त्यांचे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही त्यांना सोडून एकनाथ शिंदे गटात सामील झाले. शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात होता हे उघड गुपित आहे. त्यामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी आणि पक्षाच्या नुर्नबांधणीसाठी ही कटुता कोठेतरी थांबली पाहिजे असे उद्धव ठाकरे यांना वाटत असेल का असे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे गटाचे आवाहन, कटुता संपवण्यासाठी... 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget