एक्स्प्लोर

केंद्रीय अर्थसंकल्पात उल्लेख असलेली 'झिरो बजेट शेती' म्हणजे काय?

शेतीत उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीवरच शेती करणे म्हणजे झिरो बजेट शेती. बियाणं घरीच तयार करायचं, खतं घरीच तयार करायची. शेतकामे बैलजोडीच्या आधारे करायची.

उस्मानाबाद : केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भवासी सुभाष पाळेकरांच्या 'झिरो बजेट शेती'चा उल्लेख झाला. महाराष्ट्रात झिरो बजेट शेती विषयी टोकाची मत-मतांतरं आहेत. झिरो बजेट हा शब्दच दिशाभूल करणारा आहे, असं स्पष्ट मत परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु अशोक ढवण यांनी मांडलं आहे. हा फक्त शब्दांचा खेळ असल्याचं ढवण यांचं मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आव्हान आहे. शेती विकासाचा सध्याचा दर सुमारे अडीच टक्के आहे. त्यात शेतीसमोर वातावरण बदलाचेही आव्हान आहे. 2019 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्याचे रहिवाशी सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट शेतीच्या संकल्पनेचा उल्लेख करण्यात आला. मराठवाड्यातल्या परभणी, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पाळेकरांच्या संकल्पनेवर आधारित शेती करणारे काही शेतकरी आहेत. या शेतकर्यांशी आणि तज्ञांशी बोलून आम्ही झिरो बजेट शेतीचा ताळेबंद मांडला आहे. झिरो बजेट शेती म्हणजे काय ? शेतीत उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीवरच शेती करणे म्हणजे झिरो बजेट शेती. बियाणं घरीच तयार करायचं, खतं घरीच तयार करायची.  शेतकामे बैलजोडीच्या आधारे करायची. गायीचे गोमूत्र, लिंबोळीच्या अर्कापासून कीटकनाशके तयार करायची. घरात बैलजोडी, गाय असणे बंधनकारक. शेतात अंतर मशागत करायची नाही. शेतातला पालापाचोळा शेतात कूजू द्यायचा. मिश्र पीक पद्धती अवलंबायची. उदाहरण एक- नांदेड जिल्ह्यातील दापखेड गावचे विशवनाथ होळगे यांच्याकडे 14 एकर शेती शेती आहे. 2014 पर्यंत होळगे कर्जबाजारी होते. नेहमी अडचणींनी ग्रासलेले होते. 2014 पासून होळगेंनी पाळेकरांच्या झिरो बजेट शेतीची तंत्र स्वीकारलं. पेरणीला बियाणे घरचे. नैसर्गिक खत घरचे. नैसर्गिक औषधी घरची. त्यामुळे एक एकर पेरणीला फक्त 500 रुपये खर्च आला. भांडवलात एक लाखाची बचत झाली. नैसर्गिकरित्या पिकवलेला शेतमाल असल्याने बाजारात भाव चांगला मिळाला. आज विश्वनाथ कर्जमुक्त आहेत. उदाहारण दोन- परभणीच्या लोहगाव येथील गोविंद राऊत यांची पाच एकर माळरानाची शेती. सगळं कुटुंब शेतीत राबूनही वर्षाकाठी हातात काहीच उरत नव्हते. राऊतांनी पाच वर्षांपासून झिरो बजेट संकल्पनेनुसार शेती करण्यास सुरुवात केली. राऊतांच्या पाच एकरामध्ये केळी, भाजीपाला, शेवगा अशी पिकं आहेत. राऊत शेतीतला काडी कचराही उचलत नाहीत. गोमूत्र, शेणापासून जीवामृत तयार करुन पिकांवर फवारतात. पिकांचा दर्जा उच्चा प्रतीचा असल्याने राऊतांना भावही मिळतो. शेतीचा खर्च शून्यावर आला. उत्पन्न तीन लाखांवर गेलं. उदाहारण तीन- उस्मानाबाद जिल्ह्यातली काजळा गावातले नानासाहेब ढवण यांची पाच एकर शेती आहे. दहा वर्षांपूर्वी पाळेकरांच्या शिबिरात सहभागी होऊन नानसाहेबांनी झिरो बजेट शेती समजून घेतली. दहा वर्षांपासून ढवण हे पाळेकरांची संकल्पना शेतात राबवत आहेत. ढवण यांचं उत्पन्न वाढलं आहे. खर्च कमी झाला. ढवण यांच्या शेतात सुसज्ज गोठा आहे. त्यात चार म्हशी आणि सात रेड्या आहेत. दूध विकून पैसे मिळत आहेत. उदाहारण चार- गजानन  देशपांडे यांच्याकडे 17 एकर शेती आहे. देशपांडेंनीही दहा वर्षांपूर्वी झिरो बजेट शेती करायला सुरुवात केली. उत्पादन खर्च कमी झाला. दर्जेदार पिक आल्याने चांगला भाव मिळू लागला. गजाननरावांच्या शेतात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरत नाहीत. शेतात तयार होणारं सेंद्रीय खत पिकांना देतात. घरी दोन गावरान गायी पाळल्या आहेत. परभणीतल्या प्रभावती नेसर्गिक शेती गटाचे सदस्य परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांत झिरो बजेट शेतीची जनजागृती करतात. मात्र शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद आहे. गेल्या 12 वर्षांत परभणीत केवळ 200 शेतकरीच या संकल्पनेनुसार शेती करत आहेत. त्यांची निरनिराळी कारणं आहेत. मागच्या काही वर्षात राज्यात पाऊस कुठे सरासरी ओलांडतोय. तर बऱ्याच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. घटत्या पर्जन्याबरोबरच पिकांवरच्या नवनवीन कीडींनी शेतकरी हैराण झाला आहे. अशा स्थितीत रासायनिक प्रक्रियेद्वारे शेती सोपी ठरते. झिरो बजेट शेतीत कमी पाऊस. शिवाय उत्पादन घटते असं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं. झिरो बजेट शेतीमध्ये उत्पादनात वाढ होत नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात झिरो बजेट शेतीचा उल्लेख झाल्याने पुन्हा ही संकल्पना चर्चेत आली आहे. पण झिरो बजेट हा शब्दच दिशाभूल करणारा आहे, असं मत परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी मांडलं. शेतकऱ्यांनी घरची बियाणं वापरली तरी त्याला झिरो बजेट कसं म्हणायचं, शेतकऱ्यांच्या बियाण्यांची काहीच किंमत नाही का, शेतकऱ्यांनी केलेली मेहनत झिरो होते का? असे महत्त्वाचे प्रश्न डॉ ढवण यांनी उपस्थित केलेत.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget