एक्स्प्लोर

हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू झाले, ग्रथालयं सुरू करण्यास नेमका अडथळा काय? ग्रंथालय केव्हा होणार सुरू?

सारे व्यवहार ठप्प असताना त्याचा फटका आता ग्रंथालयांना देखील बसला आहे. मोठ्या प्रमाणातील आर्थिक गणितं बिघडली आहेत. कामगारांचे पगार देण्याकरता देखील सध्या पैसे नाहीत. सद्यस्थिती पाहता काही वाचनालयं बंद होतील का? अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी : 'वाचाल तर वाचाल' या शब्दांमध्येच सारं काही आलं. पुस्तकं, वाचन याबाद्दल कमीत कमी शब्दात व्यक्त होता येतं आणि त्याचं महत्व देखील कळतं. महाराष्ट्राला साहित्यसंपदेची, लेखकांची, कलाकारांची, संस्कृतीची एक वेगळीच देणगी लाभली आहे. अगदी श्रीलंकेतील सिंहली भाषेत देखील आपल्याला मराठी भाषेचे दाखले दिसून येतात. विपुल अशी साहित्यसंपदा लाभलेली भाषा म्हणजे मराठी. राज्यात विविध भाषांमधील साहित्य उपलब्ध असलेली ग्रंथालयं देखील मोठ्या संख्येनं आहेत. गाव-खेड्यांमध्ये देखील छोटी- छोटी वाचनालयं आहेत. पण, यासाऱ्यांसमोर सध्या आव्हान, समस्या आणि संकटं उभी राहिली आहेत. अर्थातच त्याला कारण म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा निर्णय. सारे व्यवहार ठप्प असताना त्याचा फटका आता ग्रंथालयांना देखील बसला आहे. मोठ्या प्रमाणातील आर्थिक गणितं बिघडली आहेत. कामगारांचे पगार देण्याकरता देखील सध्या पैसे नाहीत. सद्यस्थिती पाहता काही वाचनालयं बंद होतील का? अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. वाचकांना पुस्तकं मिळत नसल्यानं होणारा मनस्ताप हा वेगळा. पण, आता अनलॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात ग्रंथालयं सुरू करा अशी मागणी जोर धरताना दिसत आहेत. हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू झाली मग, ग्रंथालयं सुरू करण्यास काय हरकत? असा सवाल विचारला जातोय. नियमांच्या अधीन राहून आम्ही हे सर्व सुरू करू आणि काळजी घेऊ असा सूर सध्या ऐकायला मिळत आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती, वैज्ञानिक, मिसाईल मॅन. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी देशभरात वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त वाचन प्रेमींनी खूशखबर द्यावी अशी मागणी केली जात आहे. जर, सध्या देश, राज्य अनलॉककडे जातोय तर नियम पाळत ग्रंथालयं सुरू करण्यास परवानगी का मिळत नाही? असा सवाल देखील केला जात आहे.

जुन्या ग्रंथसंपदेला धोका

राज्यातील या परिस्थितीबाबत एबीपी माझानं रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी ''राज्यात शंभर वर्षे जुनी वाचनालयं देखील सध्या आहेत. एकंदरीत सारी परिस्थिती पाहता आर्थिक फटका बसत आहे ही गोष्ट मान्यच. पण, त्यापेक्षा पुस्तकांची होणारी हानी अधिक गंभीर बाब आहे. विविध विषयांवरील हजारो, लाखो पुस्तकं सध्या या ग्रंथालयामध्ये आहेत. पण, त्या ठिकाणी मागील सहा ते सात महिन्यापासून त्यांची निगा राखली गेलेली नसल्यानं त्यांना बुरशी लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे या बाबींचा विचार अधिक गंभीरपणे झाला पाहिजे. जर, नियम आणि अटींच्या आधारे बार सुरू होत असतील तर मग सरकार ग्रंथालयाच्या बाबतीच सावध भूमिका का घेत आहे? सध्या वाचकांचा हिरमोड तर होत आहे. शिवाय, काही ग्रंथालयांमध्ये कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नाही. तर. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना कमी देखील केले जात आहे. याबाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारनं काही अटी आणि नियम जरूर घालावेत. आम्ही त्यांचं पालन करू. ग्रंथालयं सुरू करावीत'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, आजवर आम्हाला पगार मिळण्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. पण, आम्ही याच क्षेत्रातील इतर सहकाऱ्यांशी देखील बोललो. त्यांना पगार मिळत नसल्याची माहिती रत्नागिरीतील नगर वाचनालयातील ग्रंथपालांनी दिली आहे.

मानसिक आरोग्यवर काय होतोय परिणाम?

अनेकांसाठी पुस्तकं हेच सर्वस्व असतं. ज्ञानार्जनाचं उत्तम माध्यम म्हणजे पुस्तकं. सुख-दु:खात साथ देत, जगण्याची उमेद हीच पुस्तकं देतात. पण, पुस्तकं वाचायला मिळत नसल्यानं त्याचा परिणाम हा तुमच्या मानसिक आरोग्यावर देखील होतो. ही बाब देखील लक्षात घेण्याजोगी. ग्रंथालयं सुरू न होणं ही काळजीची बाब आहेत. पुस्तकं वाचताना प्रत्येक व्यक्तिला वेगळी अनुभूती मिळते. शिवाय मेंदूचा होणारा व्यायाम देखील होतो. वाचनानं क्रिएटीव्हीटी वाढतात. त्यामुळे वाचनापासून कुणीही वंचित राहता कामा नये. हॉटेल, बार सुरू होत असताना ग्रंथालयं बंद ठेवणे चुकीचं आहे. वाचलेल्या गोष्टींची अनुभूती मिळण्यासाठी ऑनलाईन वाचनापेक्षा पुस्तकं वाचनं हे महत्त्वाचं आहे. यामुळे तोटा देखील मोठ्या प्रमाणात होतंय. वाचन करण्यास न मिळाल्यास त्याचा मनावर देखील परिणाम होत असल्याची माहिती रत्नागिरीतील मनोविकार तज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.

रत्नागिरीतील ग्रंथालयाची काय अवस्था?

ग्रंथालयांची नेमकी काय अवस्था झालेली असेल हे समजून घेण्याकरता आपण रत्नागिरी शहरातील नगर वाचनालयाचं उदाहरण घेतलं तरी पुरेसं आहे. हे वाचनालय राज्यातील सर्वात जुनं वाचनालय असून त्याची स्थापना 1828 साली झाली आहे. म्हणजेच तब्बल 193 वर्षे जुनं इतकं हे वाचनालय आहे.सध्या या वाचनालयात तब्बल 1 लाखापेक्षा देखील जास्त पुस्तकांची संख्या आहे. मराठी, हिंदीसह इंग्रजीतील साहित्य देखील याठिकणी उपलब्ध आहे. रोज दीडशे वाचक या ठिकाणी येतात. मुंबई, पुणे या शहरातील ग्रंथालयांची तुलना करता जवळपास 5 ते 6 हजारांच्या घरात या ठिकाणची वाचकसंख्या आहे. महिन्याला जवळपास 50 ते 60 हजारांची उलाढाल या ठिकाणी होते. एकंदरीत महानगरांची तुलना करता रत्नागिरीसारख्या तुलनेनं छोट्या असलेल्या शहरात ही संख्या मोठीच म्हणावी लागेल.शिवाय, जिल्ह्यात आणि शहरात देखील इतर वाचनालयं आहेत.त्यांच्याकडे देखील नजरअंदाज करून चालणार नाही. यावरू राज्य आणि मोठ्या शहरांमधील वाचनालयांची परिस्थितीची आपण किमान अंदाज बांधू शकतो.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; छळामुळे तरुणाने चिठ्ठी लिहून गळ्याला लावला दोर
बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; छळामुळे तरुणाने चिठ्ठी लिहून गळ्याला लावला दोर
NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचा 'कणा'च नव्या संविधानातून गायब?, ओबीसी अन् अल्पसंख्याक सेल वगळल्याने खळबळ, 7 ऐवजी आता फक्त 4 फ्रंटल सेल
राष्ट्रवादी काँग्रेसचा 'कणा'च नव्या संविधानातून गायब?, ओबीसी अन् अल्पसंख्याक सेल वगळल्याने खळबळ, 7 ऐवजी आता फक्त 4 फ्रंटल सेल
Ashok Kharat: अशोक खरातच्या भविष्यवाणीनुसार 'तो' आमदार तितक्याच मार्जिनने निवडून आला अन् दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूचं भाकीतही खरं ठरलं, नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात खळबळजनक दावा
अशोक खरातच्या भविष्यवाणीनुसार 'तो' आमदार तितक्याच मार्जिनने निवडून आला अन् दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूचं भाकीतही खरं ठरलं, नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात खळबळजनक दावा
Ashok Kharat CA : 18 रो हाऊस, 49 गुंठे जागा, कोरेगाव पार्क भागात मोठी संपत्ती, अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे कुठून आले?
18 रो हाऊस, 49 गुंठे जागा, कोरेगाव पार्क भागात मोठी संपत्ती, अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे कुठून आले?

व्हिडीओ

Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Embed widget